शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाची छाया; प्रशासकीय यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:20 IST

येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती जिल्ह्यात आहे

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी घेतली बैठक घरकुल, जलयुक्तला गती देण्याचे आदेश 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाच्या छायेखाली आहेत. येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती असून, त्या अनुषंगाने यंत्रणेला सतर्क करण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांची उजळणी घेण्यात आली. 

पुरवठा विभाग, कृषी विभाग, घरकुल योजना विभाग, रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आजवरची प्रगती आणि येणाऱ्या सहा महिन्यांत करावयाची कामे, याबाबत संबंधित विभागांना डेडलाईन ठरवून देण्यात आली. घरकुल योजनेसाठी जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट ३७ टक्के पूर्ण झाले आहे. ६२ टक्के घरकुल योजनेची कामे अपूर्ण आहेत. खुलताबाद वगळता सर्व तालुक्यातील घरकुलांची कामे अपूर्ण पडलेली आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत रखडलेली कामे पूर्ण करावीत, यासाठी गृहनिर्माण अभियंते व अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेतील ९३ टक्के गावांतील कामे पूर्ण झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत केला. १५ डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. 

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळी बांधण्यात आली आहे. प्रत्येक कृषी सहायकावर येणाऱ्या काळात २० शेततळे बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात ६५ हजार शेततळी होतील, असा दावा याप्रसंगी करण्यात आला. 

अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटेदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची उजळणी केली जात असताना गंगापूरमधून आलेले शेतकरी कृषी अधीक्षकांचा सकाळपासून पाठपुरावा करीत होते. गायी घेण्यासाठी कृषी विभागाने लाभार्थ्यांसाठी ५० टक्के योजना कार्यान्वित केली. मुठ्ठेवडगाव येथील २४ शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून गायी खरेदी केल्या. त्या गायींचा विमा उतरविणे, त्यांची तपासणी करणे, कृषी विभागाकडे अहवाल सादर करण्यात प्रत्येकाचे ८ हजार खर्च झाले. ४० हजारांची एक गाय, अनुदान मिळणार २० हजारांचे त्यात सरकार यंत्रणेच्या खाबुगिरीत गेले ८ हजार रुपये, अशी परिस्थिती असताना तालुका कृषी अधीक्षकाने शेतकऱ्यांना औरंगाबादला पाठविले. औरंगाबाद कृषी अधीक्षकांनी आज दिवसभर शेतकऱ्यांना बैठकीमुळे फिरविले. अनुदानातील अर्धी रक्कम मिळण्यापूर्वीच खर्च झाल्याचे शेतकरी महेश खेडकर, कचरू खेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद