शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

औरंगाबाद जिल्ह्यात ४ हजार ७३३ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:11 IST

जिल्ह्यात कुपोषणाचा आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही.

ठळक मुद्देजून महिन्यात ४ हजार ७३३ बालके तीव्र कमी वजनाची मे महिन्यात ही आकडेवारी ३ हजार १३१ एवढी होती. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३ हजार ४५४ अंगणवाड्या चालविल्या जातात. कित्येक वर्षांपासून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरदोर माता, स्तनदा माता तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसिकरण, पोषण आहार व आरोग्यविषय संदर्भ सेवा दिल्या जातात. तरिही कुपोषणाचा आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. जून महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात तब्बल ४ हजार ७३३ बालके तीव्र कमी वजनाची आढळून आली आहेत. मे महिन्यात ही आकडेवारी ३ हजार १३१ एवढी होती. 

महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या या बाबीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गरीबीमुळे खायला नाही किंवा कमी मिळते, जेवणातून पुरेसे जीवनसत्व मिळत नाही, यामुळे कुपोषण होते, हा गैरसमज आहे. कुपोषणाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये आपल्याकडे खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत. त्यामुळे जेवणातून जीवनसत्व, लोह व अन्य घटक मिळत नाहीत. गरोदर माता किंवा स्तनदा मातांमध्ये लोहाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते पालेभाज्यांमधून मिळते; पण ग्रामीण भागात जेवण केले की चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे लोह शरीराला मिळत नाही. दुसरीकडे, अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण अधिक आहे. दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर राखले जात नाही, ही आपल्याकडील कुपोषाची प्रमुख कारणे आहेत. त्यावर अंगणवाडीस्तरावरुन सातत्याने जनजागृती केली जाते. आरोग्याविषयक संदर्भ सेवा दिल्या जातात. पोषण आहार दिला जातो. त्यामुळे काही दिवसांत तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये प्रगती दिसून येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद