शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात २२ टक्के पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:37 IST

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देअजूनही प्रतीक्षा : अनेक तालुक्यांनी सरासरीही गाठली नाही; औरंगाबादेत उत्तम स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात औरंगाबाद तालुका वगळता एकाही तालुक्याने अद्यापही अपेक्षित सरासरी गाठली नाही. औरंगाबाद तालुक्यात १०५ टक्के पाऊस झाला आहे. पाठोपाठ फुलंब्री अणि वैजापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, कन्नड तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांवर पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. या दोन्ही महिन्यांत पाच ते सहा दिवस वगळता पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. तब्बल महिनाभरानंतर १६ आॅगस्ट रोजी पावसाने पुनरागमन क रून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. श्रावण सरींनी जिल्ह्याला अक्षरशा: धुवून काढले. या दिवशी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धुवाधार पाऊ स झाल्याने शेतक ऱ्यांचा जीव भांड्यात पडला. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाणीटंचाईबरोबर दुष्काळाची छाया दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांत खुलताबाद तालुक्यात नागरिकांना पावसाअभावी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. ही परिस्थिती इतर तालुक्यांमध्येही होती. मात्र, आठवडाभरातील पावसाने पाणीटंचाई कमी होण्यास हातभार लागला आहे. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के पाऊस झाला आहे.शहरात शनिवारी दुपारी ९.२ मि.मी.औरंगाबाद : शहरात शनिवारी दुपारी काही मिनिटांसाठी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळेसाठी बरसलेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. चिकलठाणा वेधशाळेत ९.२ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.शहरात दुपारी २ वाजेच्या सुमारास रिमझिम स्वरूपात पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसाने लगेच आटोपतेही घेतले. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसाचा जोर चांगलाच होता. पावसासोबत जोरदार वारेही वाहत होते. शहराला पुन्हा एकदा पाऊस धुऊन काढणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.पावसाने १५ ते २० मिनिटांतच आटोपते घेतले. पावसामुळे रस्त्यांवर चांगलेच पाणी साचलेले पाहायला मिळाले. उच्च न्यायालय परिसर, सेव्हन हिल, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, न्यायनगर परिसरासह ठिकठिकाणी पाणी साचले होते.जोरदार पावसानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपात श्रावणसरी पडत होत्या. काही वेळेसाठी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आकाशात पुन्हा मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले; परंतु पावसाची वाटच पाहण्याची वेळ शहरवासीयांवर आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस