शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

औरंगाबाद जिल्ह्यात २२ टक्के पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:37 IST

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देअजूनही प्रतीक्षा : अनेक तालुक्यांनी सरासरीही गाठली नाही; औरंगाबादेत उत्तम स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांवरील संकट दूर झाले आहे; परंतु जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २२ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात औरंगाबाद तालुका वगळता एकाही तालुक्याने अद्यापही अपेक्षित सरासरी गाठली नाही. औरंगाबाद तालुक्यात १०५ टक्के पाऊस झाला आहे. पाठोपाठ फुलंब्री अणि वैजापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, कन्नड तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांवर पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. या दोन्ही महिन्यांत पाच ते सहा दिवस वगळता पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. तब्बल महिनाभरानंतर १६ आॅगस्ट रोजी पावसाने पुनरागमन क रून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. श्रावण सरींनी जिल्ह्याला अक्षरशा: धुवून काढले. या दिवशी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धुवाधार पाऊ स झाल्याने शेतक ऱ्यांचा जीव भांड्यात पडला. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाणीटंचाईबरोबर दुष्काळाची छाया दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांत खुलताबाद तालुक्यात नागरिकांना पावसाअभावी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. ही परिस्थिती इतर तालुक्यांमध्येही होती. मात्र, आठवडाभरातील पावसाने पाणीटंचाई कमी होण्यास हातभार लागला आहे. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के पाऊस झाला आहे.शहरात शनिवारी दुपारी ९.२ मि.मी.औरंगाबाद : शहरात शनिवारी दुपारी काही मिनिटांसाठी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळेसाठी बरसलेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. चिकलठाणा वेधशाळेत ९.२ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.शहरात दुपारी २ वाजेच्या सुमारास रिमझिम स्वरूपात पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसाने लगेच आटोपतेही घेतले. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसाचा जोर चांगलाच होता. पावसासोबत जोरदार वारेही वाहत होते. शहराला पुन्हा एकदा पाऊस धुऊन काढणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.पावसाने १५ ते २० मिनिटांतच आटोपते घेतले. पावसामुळे रस्त्यांवर चांगलेच पाणी साचलेले पाहायला मिळाले. उच्च न्यायालय परिसर, सेव्हन हिल, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, न्यायनगर परिसरासह ठिकठिकाणी पाणी साचले होते.जोरदार पावसानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपात श्रावणसरी पडत होत्या. काही वेळेसाठी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आकाशात पुन्हा मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले; परंतु पावसाची वाटच पाहण्याची वेळ शहरवासीयांवर आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस