शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:41 IST

यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबाद जिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले.

ठळक मुद्देबेसलाईन सर्वेक्षण : ७० हजार कुटुंबांकडे अद्यापही नाहीत शौचालये

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबादजिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, दोन बीडीओ व ग्रामसेवकांचा मुंबईत शासनामार्फत सत्कारही करण्यात आला.तथापि, बेसलाईन सर्वेक्षणातील कुटुंबांच्या घरांमध्ये शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा हगणदारीमुक्त झालेला असला तरी तो संपूर्णपणे झालेला नाही. बेसलाईन सर्वेक्षणाबाहेरील सुमारे ७० ते ७२ हजार कुटुंबांच्या घरी अद्यापही शौचालये उभारण्यात आलेली नाहीत, अशा कुटुंबांच्या घरी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शौचालये उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे; पण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या तक्रारी होत असल्यामुळे ग्रामसेवक शौचालये उभारण्यास किती रस घेतील, यावर बरेच काही अवलंबून आहे. दुसरीकडे, ज्या कुटुंबांच्या घरी शौचालये उभारण्यात आलेली आहेत ते याचा वापर करतात का, हा देखील संशोधनाचा वेगळा विषय आहे. सन २०१२ मध्ये जिल्ह्यात बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. गावागावांत फिरून शौचालयाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राजकीय विरोधी गटांतील कुटुंबे, कामानिमित्त काही काळासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे, अशा अनेक कुटुंबांना बेसलाईन सर्वेक्षणात सामावून घेतलेच नव्हते. सध्या अशा गावागावांत अनेक कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत.प्रधानमंत्र्यांनी हाती घेतलेल्या हगणदारीमुक्त गावे या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी सहभाग घेतला होता. घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. आजही अनेक शाळांमध्ये पाण्याअभावी स्वच्छतागृह ओस पडले आहेत. अनेक ग्रामपंचायती सांडपाणी व घनकचऱ्यांबाबत गंभीर नाहीत. अनेक गावांना मिळेल त्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे, या बाबींकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.आज ग्रामसेवकांची कार्यशाळाच्हगणदारीमुक्त जिल्हा झाला आता पुढे काय, या विषयावर उद्या जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा उद्या सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहात चालणार आहे.च्यामध्ये हगणदारीमुक्त गावांचे सातत्य राखणे, शौचासाठी बाहेर कोणीही जाऊ नये, याची खबरदारी घेणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आपले सरकार केंद्रांतर्गत कोणती व किती प्रमाणपत्रे दिली जावीत, ग्रामपंचायतींचे आॅनलाईन रेकॉर्ड पद्धत आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानState Governmentराज्य सरकारRural Developmentग्रामीण विकास