शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टँकरच्या ६१९ खेपांनी ग्रामीण भागाला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:19 IST

पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे.

ठळक मुद्देसाडेपाच लाख नागरिकांची वणवण  पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांची परिस्थिती गंभीर २४३ गावांना टँकरशिवाय पर्याय नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती हळूहळू गंभीर वळणावर जात आहे. ६१९ टँकरच्या खेपा ग्रामीण भागातील तहानलेल्या गावांसाठी सध्या सुरू असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांची परिस्थिती गंभीर वळणावर असून, पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे. ८ वाड्यांसह २४३ गावांतील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना दुसरा पर्याय सध्या नाही. 

३०० च्या आसपास टँकरचा आकडा पोहोचला असून, २९८ खाजगी टँकरमार्फत हा पाणीपुरवठा सुरू आहे. १३४ विहिरींचे अधिग्रहण केल्याचे विभागीय प्रशासनाने म्हटले आहे. पैठणमधील ५० गावे, गंगापूरमधील ८२ गावे आणि वैजापूर, सिल्लोडमधील अनुक्रमे ४०, ३३ गावे टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहेत. हिवाळ्यामध्ये ३०० टँकरने पाणीपुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१२ च्या तुलनेत यंदा पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट असेल त्याचे हे द्योतक आहे. 

४१३ खेपा तीन तालुक्यांतपैठण तालुक्यात ११६ खेपा, गंगापूरमध्ये १८०, तर वैजापूर तालुक्यात ११७ खेपांनी टँकरचे पाणी ग्रामीण भागातील नागरिकांना पुरविले जात आहे. या तिन्ही तालुक्यांत ४१३ खेपा होत आहेत. १३४ विहिरींचे अधिग्रहण पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने केले आहे. त्यातील ११४ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 

तालुका          लोकसंख्या          टँकरऔरंगाबाद    ५१ हजार ५४६         २९फु लंब्री         २१ हजार ५५०         १०पैठण           १ लाख १२ हजार     ५६गंगापूर        १ लाख ५८ हजार     ९१वैजापूर       ७४ हजार ३९४          ५७खुलताबाद    ४ हजार ५००          ०१कन्नड        १७ हजार २९३         ०८सिल्लोड     १ लाख २६ हजार     ४७सोयगाव     ००    ००एकूण         ५ लाख ६५ हजार    २९९ 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद