शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

औरंगाबाद ते धुळे मार्गासाठी अखेर कंत्राटदार मिळाले; महिनाभरात होणार काम सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:27 IST

सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या उर्वरित निविदा मंजूर होऊन दोन कंत्राटदारांना काम देण्याचे बुधवारी निश्चित झाले आहे. औरंगाबाद ते करोडीपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉनला तर करोडी ते भामरवाडीपर्यंतचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. 

औरंगाबाद : सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या उर्वरित निविदा मंजूर होऊन दोन कंत्राटदारांना काम देण्याचे बुधवारी निश्चित झाले आहे. औरंगाबाद ते करोडीपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉनला तर करोडी ते भामरवाडीपर्यंतचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. 

महिनाभरात या दोन्ही टप्प्यांचे काम सुरू होईल. प्रत्येकी १ हजार कोटी रुपयांचे हे काम असून, बोढरे ते धुळे या तिसर्‍या टप्प्यातील निविदा गेल्या वर्षीच मंजूर होऊन त्या कामाला सुरुवात झाली आहे. ९० कि़मी.च्या कामासाठी तीन टप्प्यात ३ हजार कोटींचा खर्च होत असून, यासाठी तिन्ही कंत्राटदार निश्चित झाले आहेत. दरम्यानच्या काळात येथील दोन प्रकल्प संचालक बदलून गेले. यातील यू. जे. चामरगोरे यांची दिल्लीला तर यशवंत घोटकर यांची नाशिकला बदली झाली. चामरगोरे यांच्या कार्यकाळातच महामार्ग क्र. २११ डीपीआर, भूसंपादनाचे जास्तीत जास्त काम झाले होते. वाल्मी संस्थेतील भूसंपादनाचा तिढादेखील त्यांच्या कार्यकाळात सुटला होता. 

औट्रम घाटाचा डीपीआर मंजूरऔट्रम घाटाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) एनएचएआयच्या दिल्ली मुख्यालयाने मंजूर केला आहे. तीन महिन्यांत या कामाची निविदा निघण्याची शक्यता असून, साडेतीन हजार कोटी रुपयांतून ११ कि़ मी. बोगदा या घाटात निर्माण केला जाणार आहे. 

जालना रोड, बीड बायपास अधांतरीचकेंद्रीय अर्थसंकल्पात एनएचएआयच्या वाट्याला येणार्‍या अनुदानात जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यासाठी तरतूद झाली तरच हे काम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला महामार्ग क्र.२११ आणि औट्रम घाटाबाबत महत्त्वाचे निर्णय झाले. जालना रोड आणि बीड बायपासच्या कामासाठी ७८९ कोटी रुपयांच्या खर्चाचा डीपीआर दीड वर्षापासून दिल्ली मुख्यालयात पडून आहे. अर्थसंकल्पात तरतूद झाली तरच केंद्राकडून थेट अनुदान मिळेल आणि या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. वर्षभरापासून या दोन्ही प्रकल्पांचा ‘स्कोप’ कमी करण्याची चर्चा सुरू आहे. ८०० वरून ४०० कोटींत हे काम होईल काय, याची चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग