शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

दिल्ली-मुंबईला मागे टाकत औरंगाबादचा सायकल ट्रॅक देशभरातील १५ शहरांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:43 IST

औरंगाबाद शहराने सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंत शहरातील पहिला सायकल ट्रॅक विकसित केला.

ठळक मुद्देशहरात २० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीज् मिशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’ या स्पर्धेत देशभरातील १५ शहरांमध्ये औरंगाबादने स्थान मिळवले. या स्पर्धेच्या परीक्षकांनी औरंगाबादचा विशेष उल्लेख केला. औरंगाबादने मुंबई, दिल्ली, चेन्नई, इंदूर या बड्या शहरांना ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’मध्ये मागे टाकले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटी मिशनने ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’ सुरु केले. स्मार्ट सिटी मिशनमार्फत विविध शहरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११७ शहरांची नोंदणी केली होती. या शहरांनी कमीतकमी एक सायकल ट्रॅक प्रायोगिक तत्वावर तयार करण्याचे उद्दिष्ट होते.

औरंगाबाद शहराने सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंत शहरातील पहिला सायकल ट्रॅक विकसित केला. क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या मार्गावरील सायकल ट्रॅकचा विशेष उल्लेख सायकल फॉर चेंज चॅलेंज या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत परीक्षकांनी केला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरांपैकी पहिल्या पंधरा शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या यशाबद्दल पालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी समाधान व्यक्त केले. शहरात २० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. देशपातळीवर औरंगाबादचा विशेष उल्लेख केला, ही शहरासाठी भूषणावह बाब आहे. अजून बरेच काम बाकी आहे, नियोजनानुसार ते केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCyclingसायकलिंगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका