शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत होणार वाढ; ५ फेब्रुवारीपासून होणार मुंबईसाठी ‘इंडिगो’चे ‘टेकऑफ ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 18:12 IST

मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी घेणार ‘उड्डाण’

ठळक मुद्देअनेक महिन्यांची मागणी पूर्णत्वास

औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बहुप्रतीक्षित ‘इंडिगो’ची ५ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईसाठी सकाळच्या वेळेत या कंपनीकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठीही इंडिगोकडून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे. 

एअर इंडिया, ट्रूजेट आणि स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’कडूनही औरंगाबादहून नवीन विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विमानतळावर आवश्यक कस्टमर सर्व्हिस, सुरक्षा, रॅम्प पोझिशन यासह ग्राऊंड स्टाफ आदी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रियाही पार पडली.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे क ाम हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरातून ‘इंडिगो’च्या ‘टेकआॅफ ’ होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते; परंतु गेल्या ५ महिन्यांपासून या कंपनीची विमानसेवा कधी आणि कोणत्या शहरासाठी सुरू केली जाणार, याकडे प्रवाशांचे डोळे लागले होते. अखेर ५ फेब्रुवारीपासून ही कंपनी औरंगाबादहून झेपावणार आहे. औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नसल्याची बाब समोर आली होती. तेव्हा उद्योजक सुनीत कोठारी यांनी ‘एमआयएएल’चे सीईओ राजीव जैन, स्लॉट आणि डाटा मॅनेजमेंटचे सहायक व्यवस्थापक तन्वीर मौलवी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवेसाठी विमान कंपन्यांना स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा या मार्गासाठी स्लॉट देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले. या मार्गावरील विमानसेवेसाठी अर्ज येताच त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे राजीव जैन यांनी सांगितले होते. उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मुंबई विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

१८० आसनी विमानइंडिगोकडून तिन्ही मार्गांवर १८० आसनी विमानाद्वारे विमानसेवा सुरू केली जाणार आहे. चिकलठाणा विमानतळावरून जेट एअरवेजची सकाळी आणि सायंकाळी मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ही विमानसेवा बंद झाली. त्यानंतर मुंबईसाठी केवळ एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार होता. त्यानंतर एअर इंडियाने गत महिन्यात १६ आॅक्टोबरपासून आठवड्यातील तीन दिवसांसाठी मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा सुरूकेली. त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी आठवड्यात तीन दिवसांसाठी वाढली आहे; परंतु मुंबईसाठी सकाळच्या वेळेत किमान एक विमानसेवेची मागणी होत होती. अखेर इंडिगोच्या माध्यमातून ही मागणी पूर्णत्वास जात आहे.

असे आहे इंडिगोचे वेळापत्रकमुंबई-औरंगाबाद मुंबईहून सकाळी ६.२५ वाजता उड्डाण आणि ७.२५ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-मुंबईऔरंगाबादहून सकाळी ८.२० वाजता उड्डाण आणि मुंबईत ९.१५ वाजता दाखल.

दिल्ली-औरंगाबाददिल्लीहून दुपारी २.०५ वाजता उड्डाण आणि दुपारी ४ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-दिल्लीऔरंगाबादहून सायंकाळी ४.५५ वाजता उड्डाण आणि दिल्लीत सायंकाळी ६.४० वाजता दाखल.

हैदराबाद-औरंगाबाद हैदराबादहून सकाळी ११ वाजता उड्डाण आणि दुपारी १२.१० वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-हैदराबादऔरंगाबादहून दुपारी १२.४० वाजता उड्डाण आणि हैदराबादेत दुपारी १.४५ वाजता दाखल.

सर्वांच्या प्रयत्नांना यशइंडिगोकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. या कंपनीकडे ६ महिन्यांपासून पाठपुरावा केला जात होता. अखेर त्याला यश मिळाले. हे सगळ्यांचे यश आहे. आता औरंगाबादहून पुणे, नागपूरसह जयपूरसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.     - सुनीत कोठारी, उद्योजक

आंतरराष्ट्रीय सेवेसाठी प्रयत्नइंडिगोकडून मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यासाठी बुकिंगदेखील सुरू झाली आहे. यामुळे देशांतर्गत विमानसेवेत वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीही प्रयत्न केला जात आहे.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन