शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:19 IST

शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे.

ठळक मुद्देरात्री उशिरा निर्णय : आजपासूनच अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे.मागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तब्बल पाच तास घसा कोरडा केला होता. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला सक्त ताकीद दिली होती की, तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. महापालिकेतील सर्वोच्च सभागृहाचा आदेशही पाणीपुरवठा विभागाने पायदळी तुडविला. शहरातील एकाही वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अधिकाºयांना यश आले नाही. शहरातील पन्नास टक्के वॉर्डांना ऐन कडक उन्हाळ्यात पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मोजक्याच वॉर्डांवर हा अन्याय होत असतानाही संबंधित वॉर्डाचे नगरसेवकही मूग गिळून आहेत. कधी तरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यातच सोमवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा होत आहे. उंच भागातील टाक्या भरण्यास त्रास होतो. त्यामुळे मंगळवार १ मेपासून शहरातील पाणीपुरवठाच एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते त्यांना बुधवारी पाणी मिळेल. बुधवारी ज्या नागरिकांना पाणी देण्यात येणार होते त्यांना आता गुरुवारी आणि शुक्रवारचा पाणीपुरवठा शनिवारवर ढकलण्यात आला आहे.महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जुन्या शहरातील वॉर्डांना बसणार आहे. अगोदरच या भागातील वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत असे. मनपाने आणखी एक दिवसाची भर टाकली आहे.

टॅग्स :WaterपाणीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादwater shortageपाणीकपात