शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यातील जि.प.मधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना खंडपीठाचा दिलासा; होणार नियमित अस्थायी आस्थापनेवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:35 IST

नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्या. रवींद्र व्ही. घुगे यांनी मंगळवारी (दि. ८ मे) दिले.

औरंगाबाद : नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्या. रवींद्र व्ही. घुगे यांनी मंगळवारी (दि. ८ मे) दिले. जालना येथील औद्योगिक न्यायालयाच्या या संदर्भातील आदेश योग्य असल्याचा निर्वाळा देत नांदेड जिल्हा परिषदेची याचिका खंडपीठाने फेटाळली.

त्याचसोबत राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधील अशाच प्रकारच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सुद्धा रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासंदर्भात सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. जेणेकरून अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या लाभासाठी न्यायालयात जाण्याचा प्रसंग येऊ नये, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. नांदेड जिल्हा परिषद पाणीपुरवठा संघटनेचे अध्यक्ष सुधाकर गंगाराम गुंजटकर यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (सीआरटीई) घेण्यासंबंधी जालना येथील औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

न्यायालयाने ती तक्रार २१ जून २००७ रोजी मंजूर केली. रोजंदारीवर सुरुवातीच्या दिनांकापासून सलग पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार आस्थापनेवर घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. औद्योगिक न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध नांदेड जिल्हा परिषदेने खंडपीठात याचिका दाखल केली होती. सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने १९७४ च्या शासन निर्णयानुसार जालना औद्योगिक न्यायालयाने दिलेले आदेश योग्य असल्याचा निर्वाळा देत वरीलप्रमाणे आदेश दिला.   

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठzpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी