शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:24 IST

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत

- प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्न भालचंद्र वराळे यांना शनिवारी कर्नाटकचे राज्यपाल थवरचंद गहलोत यांनी बंगळुरू येथे राजभवनात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी न्या. वराळे यांचे अभिनंदन केले.

मूळचे औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य असलेले आणि येथेच वकिली केल्यावर व सरकारी वकील म्हणून सेवा बजावल्यानंतर येथूनच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होऊन मुख्य न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचलेले न्या. वराळे हे तिसरे न्यायमूर्ती ठरले आहेत. त्यामुळे मागील ४ वर्षांत तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’ देऊन औरंगाबाद वकील संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. खंडपीठ वकील संघातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान झालेले न्या. नरेश पाटील यांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी २०२२ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. इतकेच नव्हे तर आतापर्यंत वकिलांमधून १८ न्यायमूर्ती व ९ ज्येष्ठ विधिज्ज्ञ बनले आहेत.

मुख्य न्या. वराळे यांच्या शपथविधी सोहळ्यास औरंगाबाद खंडपीठातील न्या. रवींद्र घुगे, न्या. आर.जी. अवचट, न्या. श्रीकांत कुलकर्णी, न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. किशोर संत, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव ॲड. सुहास उरगुंडे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, ॲड. अतुल कराड, ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, ॲड. बालाजी येणगे, ॲड. संभाजी टोपे, ॲड. शहाजी घाटोळ पाटील, ॲड. अमरजितसिंह गिरासे आदी वकील तसेच मुंबई मुख्य पीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती आणि वकील उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयadvocateवकिल