शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:24 IST

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत

- प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्न भालचंद्र वराळे यांना शनिवारी कर्नाटकचे राज्यपाल थवरचंद गहलोत यांनी बंगळुरू येथे राजभवनात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी न्या. वराळे यांचे अभिनंदन केले.

मूळचे औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य असलेले आणि येथेच वकिली केल्यावर व सरकारी वकील म्हणून सेवा बजावल्यानंतर येथूनच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होऊन मुख्य न्यायमूर्तीपदापर्यंत पोहोचलेले न्या. वराळे हे तिसरे न्यायमूर्ती ठरले आहेत. त्यामुळे मागील ४ वर्षांत तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती’ देऊन औरंगाबाद वकील संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. खंडपीठ वकील संघातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान झालेले न्या. नरेश पाटील यांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी २०२२ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. इतकेच नव्हे तर आतापर्यंत वकिलांमधून १८ न्यायमूर्ती व ९ ज्येष्ठ विधिज्ज्ञ बनले आहेत.

मुख्य न्या. वराळे यांच्या शपथविधी सोहळ्यास औरंगाबाद खंडपीठातील न्या. रवींद्र घुगे, न्या. आर.जी. अवचट, न्या. श्रीकांत कुलकर्णी, न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. किशोर संत, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव ॲड. सुहास उरगुंडे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, ॲड. अतुल कराड, ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, ॲड. बालाजी येणगे, ॲड. संभाजी टोपे, ॲड. शहाजी घाटोळ पाटील, ॲड. अमरजितसिंह गिरासे आदी वकील तसेच मुंबई मुख्य पीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती आणि वकील उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयadvocateवकिल