शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 16:18 IST

औरंगाबाद खंडपीठाकडून प्रतिवादींना नोटीस : नागपूर करारानुसार मराठवाड्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची मागणी

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत नव्या धरणांना परवानगी देऊ नये, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नागपूर करारातील अटीनुसार स्वतंत्र बजेट देण्यात यावे, समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे मराठवाड्यात वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक शंकरराव नागरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने प्रतिवादी राज्य सरकार, मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य जलसंपदा नियमन प्राधिकरण, नाशिक आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त, गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना नोटीस बजावल्या आहेत.

याचिकाकर्ते शंकर नागरे हे १९६६ ते २००५ या कालावधीत सिचंन विभागात विविध पदांवर कार्यरत होते. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील गोदावरी नदीवर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नवीन धरण बांधले जाणार नाही, असा निर्णय ६ सप्टेंबर २००४ ला राज्य सरकारने घेतला होता, तसेच मेंढेगिरी समितीच्या २०१३ मधील अहवालानुसार जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने धरणे बांधल्या गेल्यास जायकवाडी धरण भरत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना नाशिक जिल्ह्यात दोन धरणे बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या धरण बांधणीच्या खर्चाचे प्रस्तावित अंदाजपत्रक मंजुरीसाठी शासनाच्या विचाराधीन आहे. ही बाब समोर आल्याने नागरे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील नवीन धरणांना मंजुरी देऊ नका, असे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली.

याचिकेत नमूद करण्यात आले की, नागपूर करारानुसार मराठवाडा भारतात विलीन झाला. तेव्हा मराठवाड्यातील विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची अट नमूद करण्यात आली होती. यानुसार मराठवाड्याला स्वतंत्र बजेट देण्याचे आदेश शासनास द्यावे. कोकणातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचा निर्णय २०१९ मध्ये राज्य सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादी राज्य सरकार आणि इतरांना नोटीस बजावल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.

पूर्वकडील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणावैनगंगाचे पाणी सुमारे ४२५ किलोमीटरपर्यंत उपसा करून नळगंगा प्रकल्पात टाकण्याचा ८० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नागपूर येथील अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. हे पाणी वाशिममार्गे पेनगंगा आणि येलदरी धरणात सोडल्यास मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.- शंकरराव नागरे, याचिकाकर्ते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद