शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 16:18 IST

औरंगाबाद खंडपीठाकडून प्रतिवादींना नोटीस : नागपूर करारानुसार मराठवाड्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची मागणी

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत नव्या धरणांना परवानगी देऊ नये, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नागपूर करारातील अटीनुसार स्वतंत्र बजेट देण्यात यावे, समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे मराठवाड्यात वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक शंकरराव नागरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने प्रतिवादी राज्य सरकार, मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य जलसंपदा नियमन प्राधिकरण, नाशिक आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त, गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना नोटीस बजावल्या आहेत.

याचिकाकर्ते शंकर नागरे हे १९६६ ते २००५ या कालावधीत सिचंन विभागात विविध पदांवर कार्यरत होते. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील गोदावरी नदीवर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नवीन धरण बांधले जाणार नाही, असा निर्णय ६ सप्टेंबर २००४ ला राज्य सरकारने घेतला होता, तसेच मेंढेगिरी समितीच्या २०१३ मधील अहवालानुसार जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने धरणे बांधल्या गेल्यास जायकवाडी धरण भरत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना नाशिक जिल्ह्यात दोन धरणे बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या धरण बांधणीच्या खर्चाचे प्रस्तावित अंदाजपत्रक मंजुरीसाठी शासनाच्या विचाराधीन आहे. ही बाब समोर आल्याने नागरे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील नवीन धरणांना मंजुरी देऊ नका, असे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली.

याचिकेत नमूद करण्यात आले की, नागपूर करारानुसार मराठवाडा भारतात विलीन झाला. तेव्हा मराठवाड्यातील विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची अट नमूद करण्यात आली होती. यानुसार मराठवाड्याला स्वतंत्र बजेट देण्याचे आदेश शासनास द्यावे. कोकणातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचा निर्णय २०१९ मध्ये राज्य सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादी राज्य सरकार आणि इतरांना नोटीस बजावल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.

पूर्वकडील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणावैनगंगाचे पाणी सुमारे ४२५ किलोमीटरपर्यंत उपसा करून नळगंगा प्रकल्पात टाकण्याचा ८० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नागपूर येथील अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. हे पाणी वाशिममार्गे पेनगंगा आणि येलदरी धरणात सोडल्यास मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.- शंकरराव नागरे, याचिकाकर्ते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद