शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

औरंगाबादच्या विमानसेवेचे ऑक्टोबरमध्ये ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 17:07 IST

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पूर्वीप्रमाणेच सुरु होणार उड्डाणे

ठळक मुद्देइंडिगोची दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसाठी एअरबस

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी पूर्वीप्रमाणे एअरबस उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले आहे, तसेच उदयपूर आणि अहमदाबादसाठीही नवी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्चपासून विमानसेवा बंद होती. तीन महिन्यांनी १९ जूनपासून  इंडिगोने दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली या मार्गावर उड्डाण सुरू केले.  त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोने हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू केली आहे. एअर इंडियानेही आता दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली सेवा सुरू केली आहे. हिवाळी शेड्यूलमध्ये इंडिगोने आता २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसाठी १८० आसन क्षमतेच्या, तर उदयपूर आणि अहमदाबादसाठीही छोट्या विमानाद्वारे (एटीआर) नवी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी यास दुजोरा दिला. पर्यटनाच्या राजधानीतून २१ वर्षांनंतर उदयपूरसाठी १६ आॅक्टोबर २०१९ रोजी एअर इंडियाने विमानसेवा सुरू केली  होती. ही सेवा सध्या बंद आहे; परंतु आॅक्टोबरपासून या मार्गासह एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही सुरू होणार आहे. 

विमानसेवा  होईल पूर्ववत२०१९ मध्ये हिवाळ्यात ज्याप्रमाणे विमानसेवा सुरू होत्या, त्याचप्रमाणे विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. कोरोनामुळे काही अडथळा आला नाही तर नियोजनाप्रमाणे औरंगाबादची विमानसेवा पूर्ववत होईल.- सुनीत कोठारी, उद्योजक 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकtourismपर्यटन