शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

औरंगाबादमध्ये वर्षभरात ४ हजार जणांना कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:29 IST

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये ५० टक्के बालकांचा समावेशमोकाट कुत्र्यांचे बालकांवर हल्ले सुरूच

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांकडून बालकांवर हल्ले सुरूच आहेत. पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारीदेखील कुत्रा चावल्यामुळे तीन बालकांवर घाटी रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात चार हजार जणांना चावा घेतला. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत. विशेषत: मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी सिडको, एन-२ येथील ११ वर्षीय, आसेफिया कॉलनीत ५ वर्षीय, तर जयसिंगपुरा येथील ८ वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यामध्ये एका बालकाला कुत्र्याच्या लहान पिल्लाने चावा घेतल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार करण्यात आले. याशिवाय ६ मोठ्या व्यक्तींनीही कुत्रा चावल्यामुळे रविवारी घाटीत धाव घेतली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार करण्यात आले.

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे मनपाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील रस्तोरस्ती, चौकाचौकात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. दिवसा आणि रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांवर, दुचाकीचालकांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला केला जात आहे. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कुत्र्यांच्या रूपाने बालकांवर संकटमोकाट कुत्र्यांच्या रूपाने शहरातील बालकांवर संकट निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीने मनपाकडे रेबीस लसींची मागणी केली आहे.

मनपाकडे लसींची मागणीघाटीत गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश होता. रविवारी आठ जण दाखल झाले. यात दोन बालकांचा समावेश होता. महापालिकेकडे रेबीज लसीची मागणी करण्यात आली आहे.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्राgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी