शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

औरंगाबादमध्ये वर्षभरात ४ हजार जणांना कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:29 IST

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये ५० टक्के बालकांचा समावेशमोकाट कुत्र्यांचे बालकांवर हल्ले सुरूच

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांकडून बालकांवर हल्ले सुरूच आहेत. पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारीदेखील कुत्रा चावल्यामुळे तीन बालकांवर घाटी रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात चार हजार जणांना चावा घेतला. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत. विशेषत: मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी सिडको, एन-२ येथील ११ वर्षीय, आसेफिया कॉलनीत ५ वर्षीय, तर जयसिंगपुरा येथील ८ वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यामध्ये एका बालकाला कुत्र्याच्या लहान पिल्लाने चावा घेतल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार करण्यात आले. याशिवाय ६ मोठ्या व्यक्तींनीही कुत्रा चावल्यामुळे रविवारी घाटीत धाव घेतली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार करण्यात आले.

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे मनपाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील रस्तोरस्ती, चौकाचौकात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. दिवसा आणि रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांवर, दुचाकीचालकांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला केला जात आहे. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कुत्र्यांच्या रूपाने बालकांवर संकटमोकाट कुत्र्यांच्या रूपाने शहरातील बालकांवर संकट निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीने मनपाकडे रेबीस लसींची मागणी केली आहे.

मनपाकडे लसींची मागणीघाटीत गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश होता. रविवारी आठ जण दाखल झाले. यात दोन बालकांचा समावेश होता. महापालिकेकडे रेबीज लसीची मागणी करण्यात आली आहे.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्राgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी