शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

औरंगाबादमध्ये १०० गुन्हेगारामागे ३३ जणांना होते शिक्षा, शहर आयुक्तालयाच्या हद्दीत शिक्षेचे प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:55 IST

आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र साद करणे हे तपास अधिकार्‍याचे कर्तव्य असते. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याकडून ते तपासून पाहिले जात  असल्याने  शहर पोलीस आयुक्तालयातील शिक्षेचे प्रमाण ३३ टक्केपर्यंत  वाढले.

ठळक मुद्देचालूवर्षी सत्र न्यायालयात दाखल खटल्यापैकी १४०६ खटल्याचा निकाल लागला. यातील ५४५ खटल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद: आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र साद करणे हे तपास अधिकार्‍याचे कर्तव्य असते. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याकडून ते तपासून पाहिले जात  असल्याने  शहर पोलीस आयुक्तालयातील शिक्षेचे प्रमाण ३३ टक्केपर्यंत  वाढले. विशेष म्हणजे गतवर्षी शिक्षेचे सरासरी ४४ टक्के होते.

शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल परंतु एकाही निष्पाप व्यक्तीला शिक्षा होऊ नये, हे आपल्या न्यायव्यवस्थेचे धोरण आहे. परिणामी कोणत्याही गुन्हेगाराने गुन्हा केल्याचे जोपर्यंत पुराव्यानिशी सिद्ध होत नाही,तोपर्यंत त्याला शिक्षा ठोठावली जात नाही.  औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सुमारे साडेतीन हजार गुन्ह्यांची नोंद होते. दाखल गुन्ह्याच्या प्रकारावरुन सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस नाईक कॉन्स्टेबल पदावरील अधिकारी कर्मचारी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करतात. गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने व्हावा,यासाठी पोलीस आयुक्तांसह, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक तपास अधिकार्‍यांना मार्गदर्शन करीत असतात. आरोपीविरोधात जास्तीत जास्त पुरावे, साक्षीदाराचे जबाब नोंदविण्याची जबाबदारी तपास अधिकार्‍यांची असते. तपास पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांकडून दोषारोपपत्र तपासून घेणे, त्यांनी काढलेल्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतरच न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले जाते. 

चालूवर्षी सत्र न्यायालयात दाखल खटल्यापैकी १४०६खटल्याचा निकाल लागला. यातील ५४५ खटल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सेशन कोर्टातील शिक्षेचे प्रमाण ३९ टक्के आहे. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर किरकोळ गुन्ह्याच्या १३६८ खटल्यांची सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यात आला. यातील ५१९ खटल्यातील आरोपींना न्यायलायाने  दोषी ठरवून त्यांना शिक्षा दिली. हे शिक्षेचे सरासरी प्रमाण ३८ टक्के आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस