शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

औरंगाबादमध्ये १०० गुन्हेगारामागे ३३ जणांना होते शिक्षा, शहर आयुक्तालयाच्या हद्दीत शिक्षेचे प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:55 IST

आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र साद करणे हे तपास अधिकार्‍याचे कर्तव्य असते. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याकडून ते तपासून पाहिले जात  असल्याने  शहर पोलीस आयुक्तालयातील शिक्षेचे प्रमाण ३३ टक्केपर्यंत  वाढले.

ठळक मुद्देचालूवर्षी सत्र न्यायालयात दाखल खटल्यापैकी १४०६ खटल्याचा निकाल लागला. यातील ५४५ खटल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद: आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र साद करणे हे तपास अधिकार्‍याचे कर्तव्य असते. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांच्याकडून ते तपासून पाहिले जात  असल्याने  शहर पोलीस आयुक्तालयातील शिक्षेचे प्रमाण ३३ टक्केपर्यंत  वाढले. विशेष म्हणजे गतवर्षी शिक्षेचे सरासरी ४४ टक्के होते.

शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल परंतु एकाही निष्पाप व्यक्तीला शिक्षा होऊ नये, हे आपल्या न्यायव्यवस्थेचे धोरण आहे. परिणामी कोणत्याही गुन्हेगाराने गुन्हा केल्याचे जोपर्यंत पुराव्यानिशी सिद्ध होत नाही,तोपर्यंत त्याला शिक्षा ठोठावली जात नाही.  औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सुमारे साडेतीन हजार गुन्ह्यांची नोंद होते. दाखल गुन्ह्याच्या प्रकारावरुन सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस नाईक कॉन्स्टेबल पदावरील अधिकारी कर्मचारी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करतात. गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने व्हावा,यासाठी पोलीस आयुक्तांसह, उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक तपास अधिकार्‍यांना मार्गदर्शन करीत असतात. आरोपीविरोधात जास्तीत जास्त पुरावे, साक्षीदाराचे जबाब नोंदविण्याची जबाबदारी तपास अधिकार्‍यांची असते. तपास पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांकडून दोषारोपपत्र तपासून घेणे, त्यांनी काढलेल्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतरच न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले जाते. 

चालूवर्षी सत्र न्यायालयात दाखल खटल्यापैकी १४०६खटल्याचा निकाल लागला. यातील ५४५ खटल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सेशन कोर्टातील शिक्षेचे प्रमाण ३९ टक्के आहे. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर किरकोळ गुन्ह्याच्या १३६८ खटल्यांची सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यात आला. यातील ५१९ खटल्यातील आरोपींना न्यायलायाने  दोषी ठरवून त्यांना शिक्षा दिली. हे शिक्षेचे सरासरी प्रमाण ३८ टक्के आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस