शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

औरंगाबाद : १ हजार १०० पैकी १४७ कर्मचारी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:21 IST

महापालिकेत कर्मचारी नसल्याचे कारण दाखवत मागील दोन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.

ठळक मुद्देआऊटसोर्सिंगवर हल्लाबोल : मनपा आयुक्तांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत कर्मचारी नसल्याचे कारण दाखवत मागील दोन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यातील अतिरिक्त ठरणारे कर्मचारी विभागनिहाय निवडावेत, असा आदेश चार दिवसांपूर्वीच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिला होता. सर्व विभागप्रमुखांनी शुक्रवारी यादी सादर केल्यानंतर १४७ कर्मचाºयांना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ही कारवाई होती. यापुढे कंत्राटदाराला मुदतवाढ न देता थेट मनपाच्या आस्थापनेवरच कर्मचारी भरती करण्याचाही निर्णय आयुक्तांनी घेतला.मागील १५ वर्षांमध्ये महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले. निवृत्त कर्मचाºयांचा जागाच प्रशासनाने भरल्या नाहीत. मंजूर पदांवर भरती करण्याचे दरवेळी टाळण्यात आले. दोन वर्षांपूर्वी कामांसाठी कर्मचारीच नसल्याची ओरड विभागनिहाय सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाने आऊटसोर्सिंगचा निर्णय घेतला. बचत गट, खाजगी कंत्राटदार आदींच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचारी भरती करण्यात आले. जेव्हा ही भरती सुरू झाली तेव्हा सर्वांत आघाडीवर राजकीय मंडळी पुढे होती. नगरसेवक, पदाधिकाºयांनी मोठ्या प्रमाणात आपल्या नातेवाईकांना या खाजगी भरतीत घुसडले. राजकीय वरदहस्त असल्याने हे कर्मचारी निव्वळ हजेरी लावण्याचे काम करीत आहेत. १,१०० कर्मचाºयांच्या पगारापोटी महापालिकेला दरमहा १ कोटी ६५ लाख रुपये अदा करावे लागत आहेत. एवढे पैसे खर्च करूनही पाहिजे तसे काम होत नसल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या लक्षात आले. त्यांनी चार दिवसांपूर्वीच सर्व विभागप्रमुखांना बोलावून आऊटसोर्सिंगचे अतिरिक्त कर्मचारी किती अशी विचारणा केली. २४ तासांत अतिरिक्त कर्मचाºयांचीयादी द्या, असेही त्यांनी आदेशित केली.मागील दोन दिवसांत विभागप्रमुखांनी परिश्रम करून १४७ कर्मचाºयांची यादी आयुक्तांना सादर केली. या सर्व कर्मचाºयांना घरी पाठविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराला यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला. महापालिकेतील रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.आता रिक्षांची चिरफाडघनकचरा विभागाने मागील तीन वर्षांमध्ये कचरा उचलण्यासाठी तब्बल ३५० रिक्षा भाडेतत्त्वावर लावल्या आहेत. एका वॉर्डाला ३ रिक्षा देण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २९ हजार रुपये आहे.दरमहा कोट्यवधी रुपये मनपाला खर्च करावे लागत आहेत. एवढे करूनही शहरात कचºयाचा प्रश्न जशास तसा आहे. आता आयुक्तांचा दुसरा हल्ला रिक्षांवर राहणार आहे. संबंधित विभागाला तशी सूचनाही देण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादEmployeeकर्मचारी