शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

‘...और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आये....’ रात्री स्टेट्सला ओळी; पाच तासांनी मृत्यू

By सुमित डोळे | Updated: April 4, 2024 19:46 IST

असंख्य अपूर्ण स्वप्नांचा वेदनादायी शेवट ! सुखी संसाराची गाडी आता कुठे रुळावर येत असतानाच नियतीने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.

छत्रपती संभाजीनगर : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या वसीम व साेहेल भावंडांनी मोठ्या कष्टाने कुटुंबाचा गाडा हाकत रुळावर आणला होता. पंधरा वर्षांपूर्वी किरकोळ कारणातून त्यांच्या वडिलांची हत्या झाली. त्या दु:खातून सावरत दोन्ही भावांचे विवाह झाले. आई हमीदा नातवंडामुळे दु:ख विसरून संसारात पुन्हा रमत होत्या. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत होती. सुखी संसाराची गाडी आता कुठे रुळावर येत असतानाच नियतीने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.

वसीम व सोहेल यांचे दोन काका पडेगावात तर एक काका पेन्शनपुऱ्यात राहतात. दाेन मामा जिन्सीत राहतात. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या हत्येनंतर दोन्ही भावांचे नोकरीच्या शोधात शिक्षण सुटले. मात्र मिळेल ते काम करून दोघांनी घराची आर्थिक परिस्थिती सुधारली असे सांगताना त्यांच्या मामेबहीण मोहसीना यांना अश्रू अनावर झाले होते. दोन्ही भावांचा दूध व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. पेन्शनपुऱ्यातील घर लहान पडत असल्याने आठ महिन्यांपूर्वीच ते दानाबाजार येथे किरायाने राहण्यास आले होते.

माहेरी ‘ईदी’ देऊन पत्नी सायंकाळी परतलीवसीम यांनी मंगळवारी सायंकाळी कुटुंबासाठी ईदनिमित्त कपडे व अन्य साहित्य खरेदी केले होते. वसीम यांची पत्नी तन्वीर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांची आई एकटीच दौलताबादमध्ये राहते. मंगळवारी तन्वीर मुलांसह आईकडे रमजाननिमित्त ‘ईदी’ घेऊन गेल्या होत्या. आईला भेटून आनंदात सायंकाळी घरी परतल्या आणि काही तासांत काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मृत्यूविषयी ओळींचे स्टेटस आणि पाच तासांनी मृत्यूवसीम व पडेगावमध्ये राहणारा चुलत भाऊ शेख समीर हे दोघे मंगळवारी सायंकाळी बराच वेळ सोबत होते. त्यांच्यात बराच वेळ थट्टामस्करी झाली. ईदचे नियोजन ठरले. रात्री १० वाजता वसीम यांनी व्हॉट्सॲप स्टेटसला मृत्यूविषयी ओळी ठेवल्या होत्या.‘हम बडी अझियत में हैं, दिन बा दिन जिंदगी हाथों से निकल जा रहीं है,और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आये...’या नेमक्या मृत्यूविषयीच्या विचारानंतर पुढील पाच तासांत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मृत्यूने कवटाळल्याने अनेकांना धक्का बसला.

मुलींच्या दु:खातून सावरले होते, पण सुख टिकले नाहीवसीम यांचा लहान भाऊ सोहेल यांच्या पत्नीचे आई, वडील नेवासा येथे वास्तव्यास असतात. रेश्मा यांच्या दोन वर्षांपूर्वी जुळ्या मुली जन्मत:च दगावल्या होत्या. त्यातून दोघेही अशातच सावरले होते. रेश्मा पुन्हा आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. मे महिन्यात बाळ होण्याच्या आनंदात ते होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. शेख कुटुंबाच्या असंख्य अपूर्ण स्वप्नांचा बुधवारी पहाटे वेदनादायी शेवट झाला.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग