शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या बदल्यांत ‘लिलाव’; नाराजांमध्ये खदखद सुरू,अर्थपूर्ण वाटाघाटींमुळे चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:57 IST

अनेकांनी चौकशीची मागणी सुरू केली असून, नाराज मंडळी वरिष्ठांना भेटून त्यांच्याकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर : तलाठ्यांसह प्रशासनातील अनेक पदांच्या बदल्यांचा पोळा बुधवारी (दि. २१) सायंकाळी फुटला. या बदल्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहारांच्या चर्चेचे पेव फुटले असून, नाराजांमध्ये खदखद सुरू आहे. अनेकांनी चौकशीची मागणी सुरू केली असून, नाराज मंडळी वरिष्ठांना भेटून त्यांच्याकडे दाद मागणार असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तलाठ्यांची आस्थापना देण्याच्या शासन निर्णयाला हरताळ फासला गेला आहे. बदल्यांसाठी ‘लिलाव’ झाल्याची चर्चेने जिल्हा प्रशासन वर्तुळ ढवळून निघाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करून १४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या यादीला मंगळवारी ११ वा. मंजुरी दिली. यादी अंतिम होईपर्यंत अनेकांनी विभागीय प्रशासन, जिल्हा प्रशासनकडून दबाव आणून बदली थांबविल्याची चर्चा आहे. बुधवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश निघाले. अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या तलाठ्यांना बदली नको होती, ते विविध माध्यमांतून प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले. प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक तलाठी नेमला होता, मर्जीचा सजा मिळावा, यासाठी त्याच्याकडे नाव देण्याची व्यवस्था केल्याचा सूर नाराजांनी आळविला. मॅटमध्ये प्रकरण जाऊ नये, यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहेत. बदल्यांप्रकरणी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याची ओरड सुरू झाली असून, महसूल खात्याने प्रस्थापितांच्या बदलीसाठी घेतलेल्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे.

गेल्यावर्षी केलेल्या बदल्या जैसे थेगेल्यावर्षी उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या बदल्यांमध्ये काहीही निर्णय झालेला नाही. जे पाच ते दहा वर्षांपासून जेथे होते, त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निकष लावून तेथेच ठेवले. यात संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे भले झाल्याची चर्चा आहे.

नियतकालिक बदल्यातलाठी - ९८महसूल सहायक - ४८अव्वल कारकून - २२विनंती बदल्यातलाठी - १२महसूल सहायक - ३अव्वल कारकून - ४मंडळ अधिकारी - ७वाहन चालक - १शिपाई - २

बेकायदेशीररीत्या बदली नकोसंघटनेने कायदेशीररीत्या बदली करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या, परंतु निवासी उपजिल्हाधिकारी आणि आस्थापना विभागाने जी प्रक्रिया राबविली ते समोर आले आहे. आमच्याकडे बदलीसाठी काही देवाण-घेवाण झाल्याची एकही तक्रार आलेली नाही. काही गैरप्रकार झाला असेल, तर सगळे काही समोर येईल.- अनिल सूर्यवंशी, अध्यक्ष राज्य तलाठी महासंघ

-----------------------------------------विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सवालप्रश्न : तलाठी बदल्यांसाठी लिलाव झाल्याची चर्चा आहे.खिरोळकर : समुपदेशनाने लिखित विकल्प घेऊन बदल्या केल्या आहेत.

प्रश्न : बदल्यांतील वशिलेबाजीमुळे अनेक जण नाराज आहेत?खिरोळकर : त्याबाबत अद्याप काही कानावर आलेले नाही.

प्रश्न : संघटनेच्या काेणत्या मागण्या मान्य केल्या?खिरोळकर : एक वर्ष झाले असेल, तर बदली करू नका, ही संघटनेची मागणी मान्य केली.

प्रश्न : शहरात अनेक वर्षांपासून असणाऱ्यांच्या बदल्या केल्या की नाही?खिरोळकर : काही जणांची बदली केली. काहींना एकच वर्ष झाल्यामुळे ती थांबविली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद