शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, स्वाधार शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का?

By विजय सरवदे | Updated: March 11, 2023 19:04 IST

शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर : शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेलेले विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही. अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी १६ मार्चपर्यंत अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे.

काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना?अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असतानादेखील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना राहाण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी. तसेच, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यातस्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते. शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

कोणाला मिळते शिष्यवृत्ती?महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध घटकातील अकरावी, बारावी, व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, जे शासकीय वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती दिली जाते.

कागदपत्रे काय लागतात?या योजनेसाठी विद्यार्थ्यास दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत), शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे त्या खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाइड, महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.

कोठे कराल अर्ज?या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात जमा करायचा आहे.

१६ मार्चपर्यंतची मुदतसन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १६ मार्चपर्यंत आहे.

अर्ज अचूक भरावा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह तो समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.- पी. बी. वाबळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद