शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, स्वाधार शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का?

By विजय सरवदे | Updated: March 11, 2023 19:04 IST

शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर : शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेलेले विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही. अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी १६ मार्चपर्यंत अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे.

काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना?अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असतानादेखील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना राहाण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी. तसेच, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यातस्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते. शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.

कोणाला मिळते शिष्यवृत्ती?महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध घटकातील अकरावी, बारावी, व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, जे शासकीय वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती दिली जाते.

कागदपत्रे काय लागतात?या योजनेसाठी विद्यार्थ्यास दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत), शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे त्या खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाइड, महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.

कोठे कराल अर्ज?या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात जमा करायचा आहे.

१६ मार्चपर्यंतची मुदतसन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १६ मार्चपर्यंत आहे.

अर्ज अचूक भरावा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह तो समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.- पी. बी. वाबळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद