शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पैठण तालुक्यातील १०४ बोगस कामांच्या प्रकरणात बांधकाम खात्याचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 15:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्यांलगत फोर-जी इंटरनेट केबल टाकण्यासाठी खोदकामापोटी मिळालेली रक्कम पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करण्यात आली. ती सर्व कामे कागदोपत्री करण्यात आल्याचे वृत्त लोकमतने ९ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देशहरातील रस्ते खोदल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी मिळालेली रक्कम थेट पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्चतीन वर्षांत रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने इंटरनेटसाठी केबल टाकण्याच्या कामासाठी बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते खोदले.रस्त्याच्या डागडुजीसाठी कंपनीने बांधकाम विभागाला दोन टप्प्यांत सुमारे सहा कोटी रुपये दिले.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्यांलगत फोर-जी इंटरनेट केबल टाकण्यासाठी खोदकामापोटी मिळालेली रक्कम पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करण्यात आली. ती सर्व कामे कागदोपत्री करण्यात आल्याचे वृत्त लोकमतने ९ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. त्या वृत्तामुळे बांधकाम विभागात अनेकांची पाचावर धारण बसली असून, थेट बांधकाम खात्याने याप्रकरणात लक्ष घातले आहे. ६ कोटी रुपयांचा अपहारच एक प्रकारे झालेला असून, त्यासाठी जबाबदार असणा-या सर्व अभियंत्याकडून ती रक्कम वसूल करण्याबाबत बांधकाम खात्याकडे प्रस्ताव गेला आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. 

शहरातील रस्ते खोदल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी मिळालेली रक्कम थेट पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करून ६ कोटी रुपयांचा डबल गेम करण्यात आला. तीन वर्षांत रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने इंटरनेटसाठी केबल टाकण्याच्या कामासाठी बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते खोदले. त्या रस्त्याच्या डागडुजीसाठी कंपनीने बांधकाम विभागाला दोन टप्प्यांत सुमारे सहा कोटी रुपये दिले. महावीर चौक ते चिकलठाणा (जालना रोड), महावीर चौक ते पंढरपूर या दोन रस्त्यांलगत व मधोमध खोदकाम करून ओएफसी केबल टाकण्याचे काम २०१४ ते १५ या वर्षभरात करण्यात आले. यासाठी रिलायंसने दोन टप्प्यांत सहा कोटी रुपये बांधकाम विभागाला दिले. ही रक्कम जालना रोड आणि पंढरपूर रोडच्या डागडुजीसाठी वापरणे गरजेचे असताना पैठण उपविभागामधील १०४ रस्त्यांच्या कामावर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. हा सगळा कागदोपत्री झाल्याचा दाट संशय असून, यामध्ये स्थानिक पातळीपासून वरिष्ठ अधिका-यांनी डोळेझाक केली. 

अधीक्षक अभियंता म्हणाले...अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याप्रकरणाबाबत पूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे अपेक्षित असून, दोषी आढळणा-या संबंधितांकडून ६ कोटी रुपये वसूल करण्याबाबतचा विचार बांधकाम खात्यातील वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होणे शक्य आहे.  

वाहने गिफ्ट दिल्याची चर्चा मागील दोन वर्षांतील बदलून गेलेले सर्व अभियंते याप्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. जे अभियंते बदलून गेले त्यांनी साम, दाम, दंड, भेद वापरून पुन्हा औरंगाबादेतच बदली करून घेतली. शिवाय काही लोकप्रतिनिधींनी देखील यामध्ये हात धुऊन घेतले आहेत. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी लोकप्रतिनिधींना खुश करण्यासाठी फॉर्च्युनरसारखे वाहनेदेखील गिफ्ट दिल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद