शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

By बापू सोळुंके | Updated: November 27, 2023 14:52 IST

'मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा,.' 

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जुनाट नेत्यांचे(मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता) मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जुनाट नेत्याचे स्वप्न पूर्ण होऊ न देण्यासाठी मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी  केले. 

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव  न घेता जुनाट नेते असे उल्लेख करीत जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना ओबीसी एल्गार सभामधून ते आमचे हातपाय तोडण्याची भाषा करीत आहेत, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारी भाषण करीत आहेत, सरकारने त्यांना आवरत का नाही, त्यांच्यावर गुन्हा का नोंदवित नाही,असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

जुनाट नेत्याने स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छगन भूजबळ यांना पुण्यात घेराव घातल्याकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या घटनेला भुजबळच जबाबदार आहे, त्यांची भाषा मराठा समाजाबद्दल वेगळी आहे. ओबीसी नेत्यांना तेढ निर्माण करायचे आहे,  त्यांची इच्छा मराठा समाजाने पूर्ण होऊ देऊ नये, आपल्याला २४ डिसेंबर रोजी आरक्षण मिळणारच आहे. समाजाने शांत राहावं,असे आपले समाजाचे लेकरू म्हणून कळकळीचे आवाहन असल्याचे जरांगे म्हणाले.  १ डिसेंबरपासून चौथ्या टप्प्यातील दौराचौथा टप्प्यातील आपला दौरा १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १ रोजी जालना येथे सभा होईल. २ डिसेंबर रोजी कोलते पिंपळगाव(ता.भोकरदन) येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांस अभिवादन करून चौथ्या टप्प्यातील अधिकृत दौरा सुरू होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाज बांधवांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण