शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 08:24 IST

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका केलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी  भूमिका काय आहे हे ‘अक्षरयात्रा’चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. 

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. नाशिकच्या नियोजित साहित्य संमेलनाविषयीच्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. संमेलन लोकांचे झाले पाहिजे. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी  उस्मानाबाद येथे झालेले संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे,  कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.

चर्चेतून दिशा मिळावीदोन्ही बाजूेची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी, दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा आहे. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsahitya akademiसाहित्य अकादमी