शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 08:24 IST

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका केलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी  भूमिका काय आहे हे ‘अक्षरयात्रा’चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. 

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. नाशिकच्या नियोजित साहित्य संमेलनाविषयीच्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. संमेलन लोकांचे झाले पाहिजे. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी  उस्मानाबाद येथे झालेले संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे,  कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.

चर्चेतून दिशा मिळावीदोन्ही बाजूेची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी, दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा आहे. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsahitya akademiसाहित्य अकादमी