शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 19:25 IST

आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले

पैठण: आषाढी एकादशीला आलेल्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविकांना पैठणच्या संत एकनाथ सेवा संघाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद आज वितरीत करण्यात आला. विशेष म्हणजे, संघाचे  मोफत खिचडी वाटप करण्याचे यंदाचे ३३ वे वर्ष आहे. आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आल्याने सुरेश शिंदे यांनी सांगितले. 

पंढरपूरनंतर वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेले एकमेव तिर्थक्षेत्र म्हणून पैठण आहे. वारकऱ्यांची संत एकनाथ महाराजावर मोठी श्रद्धा आहे. पंढरपूर प्रमाणेच दर एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पैठण येथे हजेरी लावतात. पांडुरंगाचे, नाथांचे भक्त असलेले वारकरी म्हणजे काबाडकष्ट करणारे शेतकरी, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत ऊन, वारा, तहान भूक याची पर्वा न करता फक्त दर्शनाच्या ओढीने पैठण शहरात हजेरी लावतात. कपाळावर नाथांच्या पादुकेवरील बुक्का लावला की त्यांचे समाधान होते. मग प्रशासनाने काय सुविधा दिल्या, काय दिल्या नाहीत याचा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. असेल तसे निभावून न्यायचे हीच समाधानी वृत्ती वारकरी संप्रदायाची चालत आली आहे. 

नाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे, नाथांच्या मंदीरातून कोणीही उपाशी जावू नये या विचाराने बबनराव उर्फ माऊली मडके, सुरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना झपाटून टाकले. सन १९९१ ला एकादशीला नाथमंदीरात साबुदाणा खिचडी करून वारकऱ्यांना मोफत वाटपाचा त्यांनी संकल्प केला. यासाठी दानशूर भक्तांची मदत घेण्यात आली. १९९१ ला एकादशीच्या दिवशी ५० किलोचा साबुदाणा आणून त्याची खिचडी प्रसाद म्हणून वाटला. ५० किलो पासून सुरू झालेला खिचडीचा प्रसाद पुढे २५ क्विंटल पर्यंत पोहचला. या उपक्रमाने ३३ वर्षाचा टप्पा ही पार केला. बबनराव उर्फ माऊली यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात गेल्या २५ वर्षापासून सुरेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, केशव भाग्यवंत सातत्याने योगदान देत आहेत. श्रमदानासाठी २५ वर्षाच्या काळात अनेक मान्यवरांनी आपली सेवा या उपक्रमासाठी अर्पित केली आहे. 

खिचडीसाठी भाविक भक्ताकडून दान दिले जाते. साबुदाणा, शेंगदाणे, तूप आदीसह भक्तदान आणून देतात. यातून ३३ वर्षापासून दर एकादशीला  खिचडी तयार करून वाटतो आहे. दान मिळो अगर न मिळो खिचडी वाटपात खंड करण्यात येत नाही, दर महिण्याच्या एकादशीला १० क्विंटल तर आषाढी व कार्तिकी एकादशीला २१ ते २५ क्विंटलपर्यंत साबुदाणा खिचडी तयार करावी लागते, असे माऊली मडके यांनी सांगितले. 

५० हजार भाविकांना वाटप आज जवळपास ५० हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी अंकुशराव काळे, कल्याण कोकणे, नारायणगाव भजणी मंडळ,  अरूण चव्हाण, सुरेश लिपाणे, भाऊसाहेब चव्हाण,  आदीसह अनेक सेवेकऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यासाठी श्रमदान केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबाद