शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

ग्रामस्थांच्या मेहनतीवर पाणी; वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेरबंद बिबट्या निसटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:21 IST

गंगापूर तालुक्यातील पिंपरी शिवरात शेतकऱ्यांनी बिबट्याला चार तास ठेवले खिळवून

- जयेश निरपळगंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : शिकारीसाठी शेळ्यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शुक्रवारी (२८) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास स्थानिकांनी मोठ्या शिताफीने घेराव घालून जेरबंद केले. मात्र, बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे बिबट्या अंधरात पसार होण्यात यशस्वी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरून रोष व्यक्त केला.

सध्या तालुक्यातील विविध भागात बिबट्याची दहशद मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने ग्रामीण भागात शेतकरी भयभीत झाले आहे. अनेकदा दिवसा देखील बिबट्याचा वावर सर्रास वाढल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे मात्र विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील पिंपरी-रांजणगाव शिवारात गट क्रमांक १४३ मध्ये सुखदेव म्हस्के यांच्या शेत वस्तीवर तारेची जाळी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात शिकारीसाठी बिबट्या शिरला होता. यावेळी बिबट्याने एका शेळीला जखमी केल्याने शेळ्यांच्या आवाजाने म्हस्के जागे झाले व त्यांनी परिसरात याबद्दल कल्पना दिली. शिवाय बॅटरीचा उजेड सातत्याने बिबट्याच्या डोळ्यावर धरून ठेवल्याने बिबट्याला काहीही दिसेनासे झाल्याने तो एकाच जागी थांबून होता. 

दरम्यान, परिसरातील तरुण मोठ्या संख्यने म्हस्के यांच्या शेतावर जमा झाले. चारही बाजूने बिबट्याला घेराव घातला. त्यांनी याबद्दल वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली वन अधिकारी कर्मचाऱ्यांना तेथे पोहचण्यासाठी रात्रीचे अंदाजे एक वाजले होते. तोपर्यंत तरुणांनी बिबट्याला जागचे हलू दिले नव्हते. विशेष म्हणजे, यादरम्यान बिबट्याला एकाही शेळीची शिकार करता आली नाही. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या दोन वन अधिकारी व चार कर्मचाऱ्यांनी सोबत कोणताही पिंजरा किंवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी साहित्य आणले नव्हते. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजूला केले. हीच संधी साधत बिबट्या गोठ्याच्या जाळी खालून पसार झाला. 

शेतकऱ्यांनी दोन ते तीन तास मोठ्या मेहनतीने बिबट्याला पकडण्यासाठी खिळवून होते. मात्र वन कर्मचाऱ्यांना त्याला अटकाव करताना किंवा ताब्यात घेताना अपयश आल्याने उपस्थित तरुण शेतकरी व ग्रामस्थांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र या ठिकाणी पूर्वीपासूनच असलेल्या गंगापूर पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत घातली. मध्यरात्री तीन ते चार तास कोणतेही प्रशिक्षण नसताना शेतकऱ्यांनी मेहनतीने राबविलेल्या बिबट्या पकडण्याच्या मोहिमेवर प्रशिक्षित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे अपयश आले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगलleopardबिबट्या