शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम

By प्रभुदास पाटोळे | Updated: February 20, 2024 14:55 IST

बीड जिल्ह्यातील प्रकरण; सरकार पक्षाचा पुरावा कमकुवत व तकलादू

छत्रपती संभाजीनगर : आरोप सिद्ध न झाल्यामुळे पतीसह सासरच्या चौघांची हुंडाबळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करणारा सत्र न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांनी कायम करीत सरकार पक्षाचे अपील फेटाळले.

हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये विवाहितेने माहेरहून आणले नसल्यामुळे शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सासरच्या लोकांवर आरोप होता. रेकॉर्डवरील पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि मृत्यूपूर्व जबाबाचे अवलोकन केले असता विवाहितेने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे निष्पन्न होते. आरोपींनी छळ केल्याबाबतचा पुरावा कमकुवत आणि तकलादू असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील बरगवाडी येथील मंदाबाई शिवाजी गुजर हिने १६ जानेवारी १९९८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. पती शिवाजी, दीर अशोक, सासरा सर्जेराव आणि सासू कांताबाई हे हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करीत छळ करीत होते, असा मंदाबाईचा मृत्यूपूर्व जबाब होता. उपचारादरम्यान १९ जानेवारी १९९८ ला मंदाबाईचा मृत्यू झाला. बीडच्या सत्र न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला शासनाद्वारे खंडपीठात आव्हान देण्यात आले. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र हंगे यांनी काम पाहिले.

एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालविणे अयोग्यएखाद्या आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवून त्याला एकापेक्षा जादा वेळा शिक्षा ठोठावणे (डबल जिओपार्डी) कायद्याला अपेक्षित नाही. मात्र, प्रस्तुत प्रकरणातील पती शिवाजीविरुद्ध १९९५ साली भादंवि कलम ४९८-अ नुसार खटला दाखल झाला होता. पती-पत्नीमध्ये तडजोड होऊन पत्नी पुन्हा नांदावयास आली होती, याकडे ॲड. हंगे यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAurangabadऔरंगाबादBeedबीड