शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्हा परिषदेच्या तब्बल ८३९ शाळा अंधारात! शाळांकडे थकले १ कोटी रुपयांचे वीजबिल

By विजय सरवदे | Updated: February 3, 2023 19:41 IST

जि.प. शाळांकडे विजेची देयके भरण्यासाठी स्वतंत्र तरतूदच नसल्यामुळे महावितरणकडून आठशेहून अधिक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

- विजय सरवदेऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांत गुणवत्ताच नाही, असे सहजपणे बोलून गुरुजींना हिणवले जाते; परंतु या शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन पुरेसा निधी देते का, याचा कोणीच विचार करीत नाही. सध्या वीज बिल थकल्यामुळे जि.प.च्या २१३० शाळांपैकी जिल्ह्यातील तब्बल ८३९ शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या शाळांत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न आहे.

खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांकडून दर्जेदार शिक्षणाच्या अपेक्षा केल्या जातात. परिणामी, या शाळा डिजिटल व्हाव्यात, या शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा असाव्यात, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांना हसत, खेळत तसेच आनंदी शिक्षण मिळेल, असे शिक्षण विभागाचे दंडक आहेत. त्यानुसार अनेक शाळांना विविध योजनांतून संगणके मिळाली; पण वीजपुरवठाच नसल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. दुसरीकडे, अनेक शाळांना आजही पत्र्याचे शेड आहे. तिथे पंखे लावावे लागतात. स्वच्छतागृहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोटारी लावाव्या लागतात. मात्र, विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे या समस्यांचा सामनाही तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षकांना करावा लागतोय, हे वास्तव आहे.

जि.प. शाळांकडे विजेची देयके भरण्यासाठी स्वतंत्र तरतूदच नसल्यामुळे महावितरणकडून आठशेहून अधिक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या शाळांकडे १ कोटी १० लाख ८४ हजार १८४ रुपये एवढे वीज बिल थकले आहे. त्यामुळे ६०० हून अधिक शाळांचे मीटरदेखील महावितरण कर्मचाऱ्यांनी काढून नेले आहे. किरकोळ वीज बिल भरण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा अनुदान आणि देखभाल अनुदान वापरण्यासाठी शिक्षण विभागाच्या सूचना आहेत; पण वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी कोणतीही तरतूद नाही.

लोकसहभागातून थकबाकी भराया समस्येकडे ‘लोकमत’ने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, जि.प. शाळांकडे वीज बिलाची थकबाकी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. थकबाकी भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद नाही, हेही खरे आहे. लोकसहभागातून ती भरावी, अशा सूचना शिक्षकांना दिलेल्या आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा अनुदानातून फक्त नियमित वीज बिल भरण्यासाठी खर्च करता येतो.

शिक्षकांसमोर अनंत अडचणीलोकसहभाग किंवा अन्य मार्गाने रक्कम उभी करताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळा व देखभाल अनुदान मिळायला हवे, असे शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे नेते सुनील चिपाटे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाmahavitaranमहावितरण