शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

पीक नुकसानीच्या विमा कंपनीकडे तब्बल ३ लाख ६९ हजार ऑनलाइन तक्रारी

By बापू सोळुंके | Updated: October 9, 2023 19:50 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन वर्षांसाठी चोलामंडल एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प पावसामुळे आधीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आल्याचे कृषी अभ्यासक सांगतात. दुसरीकडे गत महिन्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ९७६ ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे आल्या आहेत.

लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आहे. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा पीक काढून ठेवल्यानंतर आग लागून अथवा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे शेतकरी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रार करू शकतात. यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन वर्षांसाठी चोलामंडल एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाची भरपाईही याच विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तातडीने तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य आहे अथवा नाही, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत विमा कंपनीने १ लाख २० हजार ३४० तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. अद्याप २ लाख ४९ हजार ६३६ तक्रारींची पडताळणी प्रलंबित आहे. सूत्रांनी सांगितले की, तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार ९३ कोटीसूत्रांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाने वेळोवेळी खंड दिला होता. याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर झाला आहे. यावर्षी जिल्ह्यातील २० मंडळांतील ३२१ गावांमध्ये पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिला होता. यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना एकूण पीक विम्याच्या रकमेपैकी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. या आदेशानुसार विमा कंपनीने अद्याप शेतकऱ्यांना ही रक्कम दिलेली नाही. दिवाळीपूर्वी ही रक्कम देण्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा