शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानीच्या विमा कंपनीकडे तब्बल ३ लाख ६९ हजार ऑनलाइन तक्रारी

By बापू सोळुंके | Updated: October 9, 2023 19:50 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन वर्षांसाठी चोलामंडल एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प पावसामुळे आधीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आल्याचे कृषी अभ्यासक सांगतात. दुसरीकडे गत महिन्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ९७६ ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे आल्या आहेत.

लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आहे. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा पीक काढून ठेवल्यानंतर आग लागून अथवा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे शेतकरी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रार करू शकतात. यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन वर्षांसाठी चोलामंडल एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाची भरपाईही याच विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तातडीने तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य आहे अथवा नाही, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत विमा कंपनीने १ लाख २० हजार ३४० तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. अद्याप २ लाख ४९ हजार ६३६ तक्रारींची पडताळणी प्रलंबित आहे. सूत्रांनी सांगितले की, तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार ९३ कोटीसूत्रांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाने वेळोवेळी खंड दिला होता. याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर झाला आहे. यावर्षी जिल्ह्यातील २० मंडळांतील ३२१ गावांमध्ये पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिला होता. यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना एकूण पीक विम्याच्या रकमेपैकी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. या आदेशानुसार विमा कंपनीने अद्याप शेतकऱ्यांना ही रक्कम दिलेली नाही. दिवाळीपूर्वी ही रक्कम देण्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा