शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक म्हणून फसवणूक झाली, तक्रार निवारण आयोगाकडे असा करा संपर्क

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 25, 2023 15:36 IST

ग्राहकांचा हक्क सांभाळा, तक्रार निवारण आयोगाचे आदेश पाळा, नाही तर निघेल वॉरंट !

छत्रपती संभाजीनगर : शुद्ध, ताजे, गुणवत्तापूर्ण तेही योग्य दरात उत्पादन मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, ग्राहकांच्या हक्काकडे कधीकधी उत्पादक, विक्रेते दुर्लक्ष करतात. जर ग्राहकांनी अशा विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली व ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला तर तो संबंधित उत्पादक, विक्रेता यांना पाळणे बंधनकारक आहे. या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितांविरोधात ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई केली जाते. 

आयोगाच्या आदेशाची पायमल्ली झाल्यास दोषी व्यक्तीला १ महिना ते ३ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात. आतापर्यंत अनेकांना अशा कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यामुळेच आयोगाचा ‘आदेश पाळा, नाही तर निघेल वाॅरंट’.

तक्रार कशी करायची ?ग्राहकाला त्याची तक्रार ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने लिखित स्वरूपात करावी लागते. तक्रारकर्ता व्यक्तिश: किंवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारे तक्रारदेखील सादर करू शकतो. एवढेच नव्हे, तर कोर्ट फी सह नोंदणीकृत पोस्टानेदेखील पाठविले जाऊ शकते. सामान्यत: तक्रारीच्या ३ प्रती जमा कराव्या लागतात. विशेष म्हणजे तक्रार करण्यासाठी किंवा तुमची बाजू मांडण्यासाठी वकिलाची मदत घेणे बंधनकारक नाही. तक्रारदाराला त्याची बाजू लढता येऊ शकते.

वर्षभरात ९१२ तक्रारी दाखलग्राहक आयोगात मागील आर्थिक वर्षात ग्राहकांनी ९१२ तक्रारी दाखल केल्या. यात ८९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी १ मार्चपासून सुनावणी बंद आहे.

किती महिन्यात निकाल देणे बंधनकारकग्राहक आयोगालाही निकाल देण्यासाठी काळ मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यात २० डिसेंबर २०२० च्या अधिसूचनेनुसार दावा दाखल केल्यापासून ३ महिन्यांत निकाल देणे बंधनकारक आहे.

ग्राहक जागरूकता महत्त्वाचीदैनंदिन व्यवहारात ग्राहकांची होणारी फसगत व ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धन करणे हाच ग्राहक कायद्याचा मुख्य उद्देश आहे. ग्राहकांसाठी अनेक सक्षम कायदे आहेत. यामुळे ग्राहकांनी त्यांच्या हक्काचे कायदे जाणून घ्यावे. ‘कर’ वाचविण्यासाठी बिल न घेणे हे चुकीचे आहे. प्रत्येक खरेदीचे बिल घ्यावे, त्यावर त्या दुकानदारांचा जीएसटी नंबर असायला पाहिजे.- स्मिता कुलकर्णी, माजी अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू