शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

औरंगाबाद शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:07 IST

शहराचा पारा ४२ अंशांवर पोहोचला असतानाच महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : आठवड्यातून एक दिवस पाणी; नियोजन कोलमडले; असमान पाणीवाटप; नगरसेवकांचे मौन; आता आंदोलन का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराचा पारा ४२ अंशांवर पोहोचला असतानाच महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यातील नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असताना पाण्याची मागणी वाढली एवढे साधे आणि सोपे कारण देऊन महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे.महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणीही दुसऱ्याच दिवशीपासून सुरू करण्यात आली. पाण्याअभावी शहरातील काही वॉर्डांना अक्षरश: यातना सहन कराव्या लागत आहेत. एरव्ही छोट्या मोठ्या प्रकरणात बाह्या सरसावून पुढे येणारे नगरसेवकही चुप्पी साधून आहेत, हे विशेष. पदाधिकाºयांनी या निर्णयावर ‘ब्र’अक्षरही काढले नाही. म्हणजेच प्रशासनाच्या या मस्तवाल कारभाराला सत्ताधाºयांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांसाठी पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर आम्ही खूप पोटतिडकीने बोलतोय, असे चित्र महापालिकेच्या स्थायी समिती सर्वसाधारण सभेच्या सभागृहात नगरसेवकांकडून निर्माण करण्यात येते. शेवटी महापौर प्रशासनाला तीन दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी अन्यथा दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देतात. वर्तमानपत्रांमध्येही मोठमोठ्या बातम्या प्रसिद्ध होतात. तीन दिवसांनंतर परिस्थिती जशीच्या तशी असते. पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा होत नाही. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाला प्रशासन कशा पद्धतीने केराची टोपली दाखवते याचे हे उत्तम उदाहरण होय.पाण्याची मागणी वाढलीहर्सूल तलावातून महापालिकेला २ एमएलडी पाणी मिळत होते. आता तेसुद्धा बंद झाल्याने जायकवाडीच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवावी लागत आहे. त्यातच पाण्याची मागणीही दुप्पटीने वाढली आहे.नियोजनाचा अभावशहरातील काही वॉर्डांना आठवड्यातून दोनदा पाणी; त्यातही चार ते पाच तास पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिक पाणी भरणे झाल्यावर चक्क पाणी फेकून देतात. काही वॉर्डांमध्ये रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत असतात. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. पाणीपुरवठा करणारे लाईनमनच परस्पर ठरवितात.दररोज १४० एमएलडी पाणीजायकवाडीहून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. त्यातील १४० एमएलडी पाणी शहरात येते. या पाण्याचे कोणतेच नियोजन मनपाकडे नाही. आठवड्यात मनपाकडे ९८० एमएलडी पाणी जमा होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतरही महापालिका समाधानकारक पाणी नागरिकांना देऊ शकत नाही.कंपनीसाठी नागरिकांना चटकेमहापालिकेतील काही अधिकारी, सत्ताधाºयांना समांतर जलवाहिनीचे काम करणाºया कंपनीला परत आणायचे आहे. यासाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. कंपनीसाठी सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी चटके का देण्यात येत आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.वितरणात सुधारणा करणार१ मेपासून महापालिकेने ज्या वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांचा पाणीपुरवठा सहाव्या दिवशी केला. ज्यांना सहा दिवसांआड पाणी होते त्यांना आता थेट सातव्या दिवशी पाणी मिळणार आहे. शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत, नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही, पाण्याची मागणी दुप्पट वाढली आहे. पाणीपुरवठ्याच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी सर्व पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. मनपाच्या या निर्णयानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही दोन दिवसांमध्ये सुधारणा झालेली नाही.पाचव्या, सहाव्या दिवशी पाणीमुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, अल्तमश कॉलनी, किराडपुरा, कटकटगेट, बारी कॉलनी, बायजीपुरा, लोटाकारंजा, भडकलगेट, सुरेवाडी, गणेश कॉलनी, शहाबाजार, जिन्सी, खाराकुंआ, गुलमंडी, न्यायनगर, पुंडलिकनगर, उत्तमनगर, जवाहर कॉलनी, विष्णूनगर, उल्कानगरी, एन-११ गजाननगर, आरेफ कॉलनी, टाऊन हॉल, बुढीलेन, औरंगपुरा, भीमनगर भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, खडकेश्वर, नागेश्वरवाडी, समर्थनगर.

टॅग्स :WaterपाणीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादwater shortageपाणीकपात