शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:47 IST

करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन

ठळक मुद्देपीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावे

करमाड : महाआघाडी सरकारच्या अनेक फसव्या आश्वासनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बांधावर खत योजना सुध्दा फसवी आहे. उलट यामुळे खत विक्री प्रक्रियेत दलालांच्या संख्येत वाढ होऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येऊन शेतकर्‍यांकडुन जास्तीचे पैसे लुबाडण्यात येत असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. सोमवारी औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बागडे बोलत होते. 

सकाळी 11 वाजता भाजपचे आंदोलन सुरु झाले. यावेळी आ. बागडे यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर असतांना खतासाठी शेतकर्‍यांना कधीही रांगा लावायची वेळ आली नाही तर कधी विमा कंपन्यांना भांडायची वेळ आली नाही अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर चौफेर टीका केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे तात्काळ करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सोबतच पीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणी आ. बागडे यांनी यावेळी केली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, अशोक साळुंके, सजनराव मते, भावराव मुळे, गणेशराव दहिहंडे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, रामकिसन भोसले, सजन बागल, सरसाबाई वाघ, अनिल हेरडे, दिनेश शेळके यांच्यासह शेतकर्‍यांचा सहभाग होता. 

वाहतूक खोळंबली आंदोलनकर्त्यांनी 45 मिनीटे महामार्गावर ठाण मांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले डाळिंब व टमाटे आंदोलनस्थळी आणले होते. 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे