शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
2
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
3
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
4
नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
5
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
6
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
7
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
8
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
9
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
10
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
11
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
12
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
13
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
14
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
15
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
16
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
17
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
19
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
20
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगाला महिना झाला; पाऊस नाही कुणी पाहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:15 IST

कृत्रिम पावसासाठी उड्डाणावर उड्डाणे

ठळक मुद्देपडणारा पाऊस कृत्रिम की नैसर्गिक?१८ दिवस केले उड्डाण

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनचे विमान उड्डाणावर उड्डाण घेत असून, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडणारा पाऊस हा कृत्रिम आहे की नैसर्गिक, याचे स्पष्टीकरण आजवर दिलेले नाही. प्रयोगाला ९ सप्टेंबर रोजी महिना झाला. मात्र, पाऊस कुणी नाही पाहिला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले, तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने रसायनांची फवारणी केली जात आहे. मात्र, किती पाऊस झाला, याचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. 

९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रयोगाला एक महिना झाला आहे. १७ आॅगस्टपासून नियमित प्रयोगाला सुरुवात झाली. २६, २७ व २८ आॅगस्ट रोजी ढग नसल्यामुळे प्रयोग झाला नाही. २९ रोजी विमानाने १८ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. परभणी, जालना, बीड जिल्ह्यांतील ९ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी ३६ फ्लेअर्स ढगांमध्ये जाळण्यात आले. जालना, औरंगाबाद, बुलडाणा परिसरातील १८ गावांवर प्रयोग करण्यात आला. ३१ आॅगस्ट रोजी १६ फ्लेअर्स विमानाने ढगांमध्ये सोडले. जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांतील १६ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. १ सप्टेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास सी-९० विमान आकाशात झेपावले. ५ वाजता ते विमान खाली उतरले. १२ फ्लेअर्स जाळण्यात आले. कृष्णपूर, पैठण, थेरगाव, बाभूळगाव, वैजापूर, फुलंब्री, निधोना, वानेगाव भागात हा प्रयोग करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी २२ फ्लेअर्स बीडमधील १७ गावांवरील ढगात सोडले. ३ सप्टेंबर रोजी रेस्ट डे घेतल्यानंतर ४ रोजी २० फ्लेअर्स औरंगाबाद व बीडमधील १० गावांवरील ढगांत सोडण्यात आले. ५ रोजी २४ फ्लेअर्स बीड व परभणी जिल्ह्यांतील १२ गावांवर सोडले. ६ व ७ सप्टेंबर रोजी प्रयोग झाला नाही. ८ सप्टेंबर रोजी १४ फ्लेअर्स जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील ७ गावांवरील ढगांत सोडले. 

१८ दिवस केले उड्डाणकृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली असली तरी आजवर १८ दिवसच उड्डाण करण्यात आले आहे. २३५ फ्लेअर्स आजवर ढगांमध्ये सोडण्यात आले आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. ९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत किती पाऊस झाला, याची नोंद अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय