शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगाला महिना झाला; पाऊस नाही कुणी पाहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:15 IST

कृत्रिम पावसासाठी उड्डाणावर उड्डाणे

ठळक मुद्देपडणारा पाऊस कृत्रिम की नैसर्गिक?१८ दिवस केले उड्डाण

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनचे विमान उड्डाणावर उड्डाण घेत असून, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडणारा पाऊस हा कृत्रिम आहे की नैसर्गिक, याचे स्पष्टीकरण आजवर दिलेले नाही. प्रयोगाला ९ सप्टेंबर रोजी महिना झाला. मात्र, पाऊस कुणी नाही पाहिला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले, तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने रसायनांची फवारणी केली जात आहे. मात्र, किती पाऊस झाला, याचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. 

९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रयोगाला एक महिना झाला आहे. १७ आॅगस्टपासून नियमित प्रयोगाला सुरुवात झाली. २६, २७ व २८ आॅगस्ट रोजी ढग नसल्यामुळे प्रयोग झाला नाही. २९ रोजी विमानाने १८ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. परभणी, जालना, बीड जिल्ह्यांतील ९ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी ३६ फ्लेअर्स ढगांमध्ये जाळण्यात आले. जालना, औरंगाबाद, बुलडाणा परिसरातील १८ गावांवर प्रयोग करण्यात आला. ३१ आॅगस्ट रोजी १६ फ्लेअर्स विमानाने ढगांमध्ये सोडले. जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांतील १६ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. १ सप्टेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास सी-९० विमान आकाशात झेपावले. ५ वाजता ते विमान खाली उतरले. १२ फ्लेअर्स जाळण्यात आले. कृष्णपूर, पैठण, थेरगाव, बाभूळगाव, वैजापूर, फुलंब्री, निधोना, वानेगाव भागात हा प्रयोग करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी २२ फ्लेअर्स बीडमधील १७ गावांवरील ढगात सोडले. ३ सप्टेंबर रोजी रेस्ट डे घेतल्यानंतर ४ रोजी २० फ्लेअर्स औरंगाबाद व बीडमधील १० गावांवरील ढगांत सोडण्यात आले. ५ रोजी २४ फ्लेअर्स बीड व परभणी जिल्ह्यांतील १२ गावांवर सोडले. ६ व ७ सप्टेंबर रोजी प्रयोग झाला नाही. ८ सप्टेंबर रोजी १४ फ्लेअर्स जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील ७ गावांवरील ढगांत सोडले. 

१८ दिवस केले उड्डाणकृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली असली तरी आजवर १८ दिवसच उड्डाण करण्यात आले आहे. २३५ फ्लेअर्स आजवर ढगांमध्ये सोडण्यात आले आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. ९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत किती पाऊस झाला, याची नोंद अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय