शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:56 IST

क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.

छत्रपती संभाजीनगर : माजी खा. इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला; परंतु पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही. त्यांना अटक करावी या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज, सोमवारी ( दि. २३ ) छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.

माजी खा. जलील यांनी ११ जून रोजी पत्रकार परिषदेत अपशब्दाचा वापर करून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलिस ठाणे आदी ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चास आज दुपारी १२ वाजता क्रांती चौक येथून सुरुवात झाली. मोर्चात वाळूज महानगरातील बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, वडगाव (को.), घाणेगाव, रांजणगाव, करोडी, साजापूर, तीसगाव, जोगेश्वरी, शहरातील क्रांतीनगर, उस्मानपुरा, इंदिरानगर, गारखेडा, संसारनगर, समतानगर आदी वस्त्यांमधून व कन्नड, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, वैजापूर, लासूर स्टेशन, करमाड आदी ठिकाणचे हजारो आंदोलक निळा झेंडा खांद्यावर घेऊन सहभागी झाले. तर अनेकांच्या हातात इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी करणारे फलक होते. मोर्चाचे एक टोक पैठण गेट तर शेवटचे टोक क्रांती चौकात होते. सिल्लेखाना, गुलमंडीमार्गे जाऊन भडकल गेट येथे मोर्चाचा समारोप झाला.

जलील यांच्यावर नेत्यांची सडकून टीकामोर्चाचे भडकल गेट येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी शहरातील विविध आंबेडकरी नेत्यांनी माजी खा.  इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, समाजाने पैशांसाठी मते विकल्याचे म्हणत वारंवार अवमान केला, आमदार-खासदार असताना दलित वस्तीच्या निधीत जलील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही नेत्यांनी केला. तर आंदोलकांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जलील यांना तत्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली.

मोर्चाच्या मागे पालकमंत्री शिरसाट, माजी खा. इम्तियाज जलील यांचा आरोपसरकारी कागदपत्रांमध्ये जे नमूद आहे त्याचेच वाचन मी केले. हे सर्व प्रकरण पालकमंत्री शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराचे आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही. मी कोणत्याही समाजाचा अवमान केला नाही. मोर्चातील गर्दी पैसे देऊन आणलेली आहे, याच्या मागे पालकमंत्री शिरसाट असल्याचा आरोप माजी खा. इम्तियाज जलील यांनी मोर्चावरील प्रतिक्रिया देताना केला.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSanjay Shirsatसंजय शिरसाटagitationआंदोलनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर