शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

नागरी आरोग्याची तुम्हाला काळजी आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:52 IST

शासन आणि महापालिकेला १५ लाख शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी नाही काय, असा उद्विग्न सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या याचिकेच्या सुनावणीवेळी केला.

ठळक मुद्देराज्य सरकार आणि औरंगाबाद महापालिकेला खंडपीठाचा सवाल : प्रशासन कचराकोंडीबाबत गंभीर का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासन आणि महापालिकेला १५ लाख शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी नाही काय, असा उद्विग्न सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या याचिकेच्या सुनावणीवेळी केला.राज्याच्या मुख्य सचिवांनी १ मार्च रोजी खंडपीठात शपथपत्र आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर केला. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी का होत नाही, प्रशासन याबाबत गंभीर का नाही, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. जागोजागी कचरा जळतो आहे, जळालेल्या कचऱ्यातून निर्माण होणारा वायू लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याला हानिकारक आहे. पोलिसांचे ‘स्कॉड’ नेमूनही या प्रकाराला आळा का बसत नाही, असे खंडपीठाने म्हटले.आज विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग सुनावणीच्या वेळी खंडपीठात उपस्थित होते.औरंगाबाद महापालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त नेमण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी आजच दुपारी बैठक बोलावली आहे. तसेच औरंगाबाद शहरातील घनकचºयाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनीसुद्धा आजच मंत्रालयात सर्व महत्त्वाच्या अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. त्यात आवश्यक ते निर्देश देण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी आज खंडपीठास दिली.घनकचºयावरील प्रक्रियेसाठीच्या जागा निश्चितीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, कचºयावरील प्रक्रियेसाठीच्या मशीन (यंत्र) खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्याची विनंती राज्य शासन आणि महापालिकेने आज संयुक्तपणे केली. त्यावरून खंडपीठाने याचिकांची पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ठेवली आहे. तसेच मनपावर प्रशासक नियुक्तीबाबतच्या याचिकेवर आणि अवमान याचिकेवरही २६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णीच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, मिटमिटा येथील याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ, अन्य याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत थोरात, नारेगाववासीयांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. औटी, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. उत्तम बोंदर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे हे काम पाहत आहेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारHigh Courtउच्च न्यायालय