शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

उड्डाणपूल कोसळण्याची वाट पाहात आहात काय? खंडपीठाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:46 IST

दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देऊन मृतांना जिवंत करता येईल काय?

औरंगाबाद : उड्डाणपुलांवर डांबराचे थरांवर थर टाकून पूल कोसळण्याची वाट पाहात आहात काय? अशा दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देऊन मृतांना जिवंत करता येईल काय? भरपाई देऊन झालेल्या नुकसानाची भरपाई होऊ शकेल काय, याचा पुनरुच्चार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस.जी. मेहरे यांनी आदेशात केला आहे.

नियमानुसार उड्डानपुलावरील डांबराचा थर ६५ मीमी असावयास हवा; मात्र तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार महावीर चौकातील उड्डाणपुलावर ७२ मी.मी. असून, ७ मीमी जादा आहे. मोंढानाका उड्डाणपुलावर ११३ मी.मी. असून ६३ मी.मी. जादा, जळगाव टी पॉइंट उड्डाणपुलावर ७२ मी.मी. असून ७ मीमी जादा आणि रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलावर ९९ मी.मी. असून, ३४ मी.मी. जादा आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटचे निर्देशया पार्श्वभूमीवर २५ जानेवारी २०२२ पर्यंत शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल १० फेब्रुवारीपर्यंत शपथपत्रासह सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस.जी. मेहरे यांनी नुकतेच तज्ज्ञ समितीला दिले आहेत. त्याचप्रमाणे समितीने ज्या उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही, त्यांचीही तपासणी १५ फेब्रुवारीपर्यंत करण्याचे व त्याचा अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्रासह सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. शिवाजी नगरच्या भुयारी मार्गाचा प्रगती अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारी वकिलांना दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी ७ मार्च २०२२ रोजी दुपारी २:३० वाजता ठेवली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.

डांबरीकरणाचा थर ६५ मी.मी. असावाखंडपीठाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने अहवालाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे की, इंडियन रोड कॉंग्रेसने २०१३ साली शासनाच्या तपशीलाप्रमाणे (स्पेशीफिकेशन) उड्डान पुलावरील डांबराचा थर ६५ मी.मी. असावा. दुसरा थर टाकण्यापूर्वी पहिला संपूर्ण थर काढून टाकावा. उड्डाणपुलांवर थरावर थरांना मंजुरी देऊ नये, असे बंधनकारक आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ