शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

‘निकाह’ अत्यंत साधेपणाने करण्याचे हजरत मौलाना साद यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:10 PM

‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.

ठळक मुद्दे९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी.

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मुस्लिम बांधव ‘निकाह’पद्धतीवर अनावश्यक पद्धतीने लाखो रुपये खर्च करीत आहेत. हे अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांना अजिबात अपेक्षित नाही. ‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.

रविवारी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ‘असर’ची नमाज इज्तेमास्थळी अदा करण्यात आली. ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. जिथे जागा मिळेल तिथेच नमाज अदा करण्यात आली. रविवारी या परिसरात कुठेच पाय ठेवायला जागा नव्हती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी. यातच अल्लाह ‘राजी’होऊ शकतात. लग्नकार्य अत्यंत साधेपणाने साजरे करायला हवे. साथींनी दावतच्या कामात आपले अधिक योगदान दिले पाहिजे.

आयुष्यात यशस्वी होण्यामागे साधेपणा खूप आवश्यक आहे. आपल्या अपत्यांवर कसे संस्कार करणार हे अगोदरच ठरवून घ्या. एकोप्यातील गोष्टी चार जणांसमोर अजिबात सांगू नये, असेही साद साहब यांनी सांगितले. हजरत साद साहब यांचे मार्गदर्शन लाखो साथी बांधव अत्यंत शांतपणाने ऐकत होते. इज्तेमामध्ये दिल्लीहून आलेले हजरत मौलाना साद साहब यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी साथी बांधव आतुर झाले होते. मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी तीनवेळेस मार्गदर्शन केले. उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच दुआ होणार आहे.

तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाहऔरंगाबाद शहरात यापूर्वी जिल्हानिहाय इज्तेमामध्ये शेकडोंच्या संख्येने सामूहिक विवाह लावण्यात आले आहेत. तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाह लागण्याची ही पहिलीच वेळ होती. लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने लग्न सोहळा होणे हे कधीतरी घडत असते. मुख्य मंडपाच्या परिसरात जिल्हानिहाय लग्न लावण्यात आले.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८Aurangabadऔरंगाबाद