शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

निवडणुकीदरम्यान काहीही होऊ शकते; गुप्तचर संस्थांच्या अहवालानंतर प्रशासन अलर्ट: कलेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:45 IST

कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते. त्यामुळे पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट रहावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली असून जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता कशी असेल, याची माहिती देताना जिल्हाधिकारी बोलत होते. 

यावेळी पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती. निरीक्षक आल्यानंतर वेबकास्ट व्होटिंग सेंटरचा निर्णय होणार आहे. याबाबत आयोगाने मार्गदर्शन केले आहे. जी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत त्यावर सूक्ष्म निरीक्षण असतील, अशी काही केंद्रे आहेत. ज्या ठिकाणी येथून मागे काही झाले नाही, परंतु यावेळी काहीही होऊ शकते, असे अहवाल आमच्याकडे गुप्तचर संस्थांकडून आले आहेत.

अंडरकरंट पोलिस आणि जिल्हा प्रशासनापर्यंत येत नाही काय, या प्रश्नाचे उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत. सोशल मीडियाबाबत सेल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी टीम असणार आहे. सोशल मीडियात कुणीही प्रक्षोभक, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यास कडक कारवाई होईल.

अशी असेल आचारसंहिता.....प्रचार साहित्य छापून देणाऱ्यांना मुद्रक, प्रकाशक, बिल रकमेची माहिती देणे बंधनकारक.नवीन कुठलाही परवाना प्रशासकीय पातळीवरून मिळणार नाही.कुणाच्याही मालमत्तेवर एनओसीविना झेंडे, पोस्टर, स्टिकर लावता येणार नाही.फेक न्यूज व्हायरल करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष असेल.जिल्ह्यात आणि शहरातील सीमांवर चेकपोस्ट असणार.

उमेदवार वाढल्यास काय करणार...ईव्हीएमद्वारे ३८४ उमेदवारांपर्यंत मतदान घेता येते. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर आयोगाने याबाबत सूचना दिल्या आहेत. उमेदवार जास्त आल्यास बॅलेट पेपर मतदान घेण्याची तयारी देखील प्रशासन ठेवून आहे. परंतु, तशी वेळ येणार नाही. ग्रामीण भागासह शहरी भागातून आढावा घेण्यात येत आहे.

शहर संवेदनशील आहे....पोलिस आयुक्त लोहिया म्हणाले, शहर संवदेनशील आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी एसआरपीच्या ३ व सीआरपीएफच्या दोन तुकड्या मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. शहरात ६० पोस्ट असातील . ५४ इमारतीतील ६६ संवदेनशील बूथ आहेत. ४ डीसीपी, ८ एसीपी, १४७ एपीआय, सुमारे ३ हजार पोलिस कर्मचारी बंदेाबस्तात असतील. शहरातील १२०० हत्यार परवाने जमा केले आहेत. तर, ग्रामीण भागातील ५५० परवाने जमा केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद