शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

By मुजीब देवणीकर | Updated: June 8, 2023 14:12 IST

‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले असून, या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सर्वोत्तम कामगिरीबद्दल २ कोटींचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षीही मनपाने दोन कोटींचा पुरस्कार पटकावला होता.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था, १६,४१३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. लोकसंख्यानिहाय ११ गटांतील विजेते निवडण्यात आले. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये संभाजीनगर महापालिकेला विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, उद्यान अधीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग व ड्रेनेज विभाग यांनी यासाठी मेहनत घेतली.

शहराच्या जमेच्या बाजू: शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, झाडे टिकविणे.घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प.नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे.शहर सौंदर्यीकरणाकडे गांभीर्याने दिलेले लक्ष.हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारंजे व्हर्टिकल गार्डन.खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेणे.पारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर, विजेची बचत, सोलर पॅनल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार