शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

By मुजीब देवणीकर | Updated: June 8, 2023 14:12 IST

‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले असून, या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सर्वोत्तम कामगिरीबद्दल २ कोटींचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षीही मनपाने दोन कोटींचा पुरस्कार पटकावला होता.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था, १६,४१३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. लोकसंख्यानिहाय ११ गटांतील विजेते निवडण्यात आले. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये संभाजीनगर महापालिकेला विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, उद्यान अधीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग व ड्रेनेज विभाग यांनी यासाठी मेहनत घेतली.

शहराच्या जमेच्या बाजू: शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, झाडे टिकविणे.घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प.नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे.शहर सौंदर्यीकरणाकडे गांभीर्याने दिलेले लक्ष.हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारंजे व्हर्टिकल गार्डन.खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेणे.पारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर, विजेची बचत, सोलर पॅनल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार