शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

By मुजीब देवणीकर | Updated: June 8, 2023 14:12 IST

‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले असून, या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सर्वोत्तम कामगिरीबद्दल २ कोटींचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षीही मनपाने दोन कोटींचा पुरस्कार पटकावला होता.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था, १६,४१३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. लोकसंख्यानिहाय ११ गटांतील विजेते निवडण्यात आले. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये संभाजीनगर महापालिकेला विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, उद्यान अधीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग व ड्रेनेज विभाग यांनी यासाठी मेहनत घेतली.

शहराच्या जमेच्या बाजू: शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, झाडे टिकविणे.घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प.नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे.शहर सौंदर्यीकरणाकडे गांभीर्याने दिलेले लक्ष.हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारंजे व्हर्टिकल गार्डन.खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेणे.पारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर, विजेची बचत, सोलर पॅनल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार