शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

मार्चपर्यंत आणखी १७ हजार नवीन एलईडी दिवे

By | Updated: November 29, 2020 04:05 IST

औरंगाबाद : प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या कोमात गेलेल्या अर्थव्यवस्थेला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेचे आर्थिक हित डोळ्यासमोर ...

औरंगाबाद : प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या कोमात गेलेल्या अर्थव्यवस्थेला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून दिल्ली येथील इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सीलाच नवीन १७ हजार एलईडी दिवे लावण्याचे काम दिले असून मार्चअखेरपर्यंत कंपनीने हे काम पूर्ण करून देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी महापालिका कंपनीला एक रुपयाही देणार नाही हे विशेष.

शहरातील जुने ४० हजार पथदिवे बदलून वीज बचतीचे नवे एलईडी पथदिवे लावण्याचे कंत्राट महापालिकेने १२० कोटी रुपयांत दिले आहे. या निविदेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सी या जुन्याच एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. एजन्सीने काम पूर्ण केले असून, महिन्याला ६० ते ७० लाख रुपयांचे पथदिव्यांचे बिल कमी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. १२० कोटी रुपयांच्या निविदेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात आणखी १७ हजार जुने पथदिवे असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान, केंद्र शासनाने एलईडी दिवे लावण्यासाठी देशभर एजन्सी नियुक्त केल्या आहेत. या एजन्सीमार्फत १७ हजार दिवे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला, पण नंतर हे काम इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सी या जुन्याच एजन्सीलाच देण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. तसेच हे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मनपाकडून साडेपाच कोटींची तरतूद

१७ हजार दिवे लावण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क एजन्सीला दिले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, या कामासाठी ५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निविदेच्या पार्ट बी अंतर्गत २५.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेतून ५.५० कोटींची तरतूद करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

---------------