शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देशात ८ कोटी व्यापाऱ्यांची वार्षिक १४० लाख कोटींची उलाढाल; २५ कोटी लोकांना मिळतो रोजगार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 10, 2023 13:34 IST

व्यापार सोपा करण्यासाठी ‘एक देश एक परवाना’ लागू करा; कॅटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : देशाअंतर्गत व्यापार करणारे आजघडीला ८ कोटी लहान-मोठे व्यापारी आहेत. सर्वांचा मिळून वार्षिक उलाढाल १४० लाख कोटीपर्यंत होत आहे. एवढेच नव्हे तर या व्यापाऱ्यांनी २५ कोटी लोकांना रोजगार दिला आहे. यात सरकारचा काहीच हातभार नाही, व्यापाऱ्यांनी हे स्वकष्टाने व मेहनतीने केले आहे. मात्र, आजही व्यापार सुरू करण्यासाठी २० ते २८ परवाने काढावे लागतात. हेच सर्वात त्रासदायक काम आहे. पंतप्रधान म्हणतात की, ‘एक देश एक कायदा’ याच धर्तीवर आमची मागणी आहे की, ‘एक देश एक परवाना’ लागू करावा तसेच ‘करप्रणाली’ सुटसुटीत केली तर व्यापार वाढेल, करदात्यांची संख्या वाढेल यामुळे सरकारच्या महसुलात आणखी मोठी भर पडेल, देशाचा आणखी विकास होईल, केंद्र व राज्य सरकारला अशी साद कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे (कॅट) राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी येथे घातली.

कॅट स्थानिक शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी ते रविवारी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यापारी व सरकारी धोरण याविषयी सविस्तर मांडणी केली.

१) जीएसटी करप्रणाली बदल व्यापाऱ्यांची भूमिका काय आहे.उत्तर : जीएसटी ही करप्रणाली चांगली आहे. आता लागू होऊन ६ वर्षे झाली. यात अनेक त्रुटी आहेत. यामुळे करदात्यांना त्याचा त्रास होतो. यामुळे व्यापारी नाराज आहेत. आम्ही सरकारकडे त्यासंदर्भात निवेदन दिले आहे. मंत्रालय त्यावर विचार करीत आहे. सरकारने व्यापारी संघटनेशी बैठक घ्यावी व ‘करप्रणाली’ अधिक सोपी व सुटसुटीत कशी करता येईल, यावर विचार करून ‘करप्रणालीत बदल करावा’ ही आमची मागणी आहे. करप्रणाली अशी असावी की, बनावट बिल, करचुकवेगिरी याला कुठेच स्थान नसावे.

२) अर्थसंकल्पाबद्दल व्यापाऱ्यांची नेहमीच नाराजी असते, असे का.उत्तर : स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशात केंद्र असो वा राज्य सरकार जेवढी सरकारे आजपर्यंत एकाही सरकारने ‘देशातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प जाहीर केला नाही. देशात जो व्यवसाय वाढला तो व्यापाऱ्यांनी स्वत:च्या हिंमतीवर वाढविला आहे. शेतकरी, उद्योजकांप्रमाणे व्यापार क्षेत्राचाही विचार अर्थसंकल्पात झाला पाहिजे.

३) पेन्शन योजनाचा व्यापाऱ्यांना किती फायदा झाला.उत्तर : केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी पहिल्यांदा पेन्शन योजना लागू केली. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण, या योजनेत पुन्हा अनेक त्रुटी आहेतच. किचकट अटी असल्याने ग्रामीण सोडा, शहरातील व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होत नाही. व्यापारी ६० वर्षांचा झाला की, त्याने आयुष्यात जेवढे ‘कर’ सरकारी तिजोरीत जमा केला. त्यातील काही टक्के रक्कम त्या व्यापाऱ्यास पेन्शन स्वरूपात मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे.

टॅग्स :MarketबाजारGSTजीएसटीAurangabadऔरंगाबादTaxकर