शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

संतापजनक! मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:29 IST

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार करण्याऐवजी रूग्णांसोबतच्या नातेवाईक व ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याची माहिती

खुलताबाद ( औरंगाबाद) : बाजार सावंगी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने विषारी द्रव्य प्राशन केलेल्या एका तरुणाला वेळीच प्राथमिक उपचार मिळाले नाहीत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार करण्याऐवजी रूग्णांसोबतच्या नातेवाईक व ग्रामस्थांना शिवीगाळ केली. यामुळे हतबल नातेवाईक उपचारासाठी औरंगाबादकडे घेऊन जात असताना तरुणाचा वाटेतच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद असल्याने वेळीच प्राथमिक उपचार झाले नाहीत, यामुळे औरंगाबादकडे घेऊन जाताना तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

खुलताबाद तालुक्यातील धामणगाव येथील दादाराव शेषराव आघाडे (३५)   याने रविवारी दुपारी अडीच वाजता विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती गंभीर झालेल्या दादारावला धामणगावचे उपसरपंच विकास कापसे व नातेवाइकांनी बाजार सांवगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी तीन वाजता उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत तुपे यांना उपचारासाठी पाचारण करण्यात आले असता ते मद्यधुंद अवस्थेत होते. 

नातेवाईकांनी जाब विचारला असता डॉ. तुपे यांनी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करण्याऐवजी आरडाओरडा सुरु केला. डॉक्टरांची अवस्था पाहून नातेवाईकांनी दादारावस तत्काळ औरंगाबादला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाटेतच दादाराव याचा मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार मिळाले असते तर दादाराव वाचले असते असा दावा नातेवाईकांनी केला आहे. मद्यधुंद डॉ. तुपे उपचार करू न शकल्याने दादारावचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइक व लोकप्रतिनिधी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिली. 

माजी उपसभापती प्रभाकर शिंदे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप निकम, धामणगावचे उपसरपंच विकास कापसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारसांवगी यांनी पंचनामा करून तशी नोंद व्हिजीट बुक मध्ये केली आहे. कामावर असताना मद्यप्राशन करून आरोग्य केंद्रात धिंगाणा घालून शिवीगाळ करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुपे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी माजी उपसभापती प्रभाकर शिंदे, संदीप निकम यांनी केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची वाईट अवस्था असून डॉक्टर असूनही रूग्णांना त्याचा फायदा होत नाही. तक्रारीकरून ग्रामस्थ थकले, पंरतू आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी सुधारले नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरDeathमृत्यू