शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का?

By मुजीब देवणीकर | Updated: January 25, 2024 14:50 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवघ्या दहा महिन्यांत काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले. अजूनही ३०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यापूर्वी शहराला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. राजकीय नेत्यांसह महापालिकेनेही १५ फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसाआड पाणी मिळेल अशी घोषणा केली. त्यानुसार आता फक्त २२ दिवस शिल्लक आहेत. पंपिंग स्टेशन, क्रॉस कनेक्शन, जलशुद्धीकरण केंद्र आदी कामे पूर्ण झाली का? यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला विलंब होतोय. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक आहे. पाणी प्रश्नाचे चटके सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला बसतील अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे तातडीने २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवघ्या दहा महिन्यांत काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले. अजूनही ३०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले आहे. बिडकीन येथे एका मंदिराचा अडथळा निर्माण होताेय. ठिकठिकाणी क्रॉस कनेक्शनची काम शिल्लक आहेत. फारोळा जलशुद्धीकरण केंद्र उभारणीला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही सर्व कामे होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खूप लवकर कामे केल्यास १ मार्चपर्यंत शहरात मुबलक पाणी येऊ शकते. पुढील २५ दिवसांत टेस्टिंग होण्याची शक्यताही कमीच आहे.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रसध्या वापरात असलेल्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १८५ एमएलडीपर्यंत आहे. सध्या १२० एमएलडी पाणी शुद्ध केले जात आहे. नवीन जलवाहिनीतून ५५ एमएलडी पाणी येईल. १७५ एमएलडी पाणी शहरात आणले जाणार आहे. याच ठिकाणी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. ते नियोजित वेळेत होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जुन्या केंद्राचाच आधार घ्यावा लागेल.

नवीन पंपिंग स्टेशन उभारणी सुरूजायकवाडी महापालिकेने १९७२ मध्ये पंपिंग स्टेशन उभारले. त्याच ठिकाणी नवीन मोठ्या अश्वशक्तीचे पंप बसविणे शक्य नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपसा केंद्र आहे, त्याच्या खालील बाजूला शेड उभारून पंपिंग स्टेशन केंद्र उभारले जात आहे. येथे ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप बसविले जातील. एक पंप स्टँडबाय असणार आहे. किर्लोस्कर कंपनीकडून खास एवढ्या मोठ्या अश्वशक्तीचे पंप बनवून घेण्यात आले आहेत.

दोनच जलकुंभ मनपाच्या ताब्यातमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेला आतापर्यंत दोनच जलकुंभ मनपाच्या ताब्यात दिले आहेत. पहिले पहाडसिंगपुरा आणि दुसरे टीव्ही सेंटर आहे. खूप घाई केली तर हिमायतबाग येथील जलकुंभ मार्चमध्ये टेस्टिंगनंतर मिळेल.

वेळेत पाणी येईलच...१५ फेब्रुवारीपूर्वी शहरात पाणी आलेच पाहिजे अशा पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा काम करीत आहे. छोटे-छोटे अडथळेही दूर होतील. ३० जानेवारीला टेस्टिंग घेण्यासंदर्भात आम्ही काम करीत आहोत. डेडलाइन टळणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी