शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अन्नदाता शेतकरी संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन; जोशी-शेट्टी यांच्या संघटनांसमोरही आव्हान?

By स. सो. खंडाळकर | Updated: April 21, 2023 11:54 IST

छत्रपती संभाजीनगरात २४ एप्रिलची सभा जबिंदा लॉन्सवर : महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार, बीआरएसची २८८ जागांची तयारी

छत्रपती संभाजीनगर : अन्नदाता शेतकरी संघटना बुधवारी हैदराबादेत के. चंद्रशेखर राव यांच्या ‘बीआरएस’ पक्षात विलीन झाली. शिवाय शरद जोशी व राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनांसमोरही ‘बीआरएस’ने मोठे आव्हान उभे केले असून, विदर्भ व नाशिक भागातील या संघटनांचे कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. काहींनी प्रवेशही केला असल्याचे समजते.

२४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जबिंदा लॉन्सवर के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश अपेक्षित आहेत; तसेच सभेसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणले जाण्याची शक्यता आहे. ही सभा कशी होते, त्यात किती शक्तिप्रदर्शन घडते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहेच. के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा शेतकरी पॅटर्न महाराष्ट्रात किती यशस्वी होतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून ‘बीआरएस’ने हालचाली वाढविल्या असून, २८८ जागा लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे वरिष्ठ सूत्राने सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘बीआरएस’ची वाट धरली आहे. आता अन्नदाता शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा जयाजी सूर्यवंशी यांनी हैदराबादमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे उपस्थित होते. आम्ही आमची संपूर्ण संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन केली असल्याचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. तेलंगणात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज व पाणी मोफत मिळते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही शून्य टक्के आहे. २४ एप्रिल रोजीच्या जाहीर सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आमखास मैदानावर होणारी ही सभा आता जबिंदा लॉन्सवर होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून स्थळ बदलण्यात आले आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी