शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

अन्नदाता शेतकरी संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन; जोशी-शेट्टी यांच्या संघटनांसमोरही आव्हान?

By स. सो. खंडाळकर | Updated: April 21, 2023 11:54 IST

छत्रपती संभाजीनगरात २४ एप्रिलची सभा जबिंदा लॉन्सवर : महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार, बीआरएसची २८८ जागांची तयारी

छत्रपती संभाजीनगर : अन्नदाता शेतकरी संघटना बुधवारी हैदराबादेत के. चंद्रशेखर राव यांच्या ‘बीआरएस’ पक्षात विलीन झाली. शिवाय शरद जोशी व राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनांसमोरही ‘बीआरएस’ने मोठे आव्हान उभे केले असून, विदर्भ व नाशिक भागातील या संघटनांचे कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. काहींनी प्रवेशही केला असल्याचे समजते.

२४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जबिंदा लॉन्सवर के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश अपेक्षित आहेत; तसेच सभेसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणले जाण्याची शक्यता आहे. ही सभा कशी होते, त्यात किती शक्तिप्रदर्शन घडते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहेच. के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा शेतकरी पॅटर्न महाराष्ट्रात किती यशस्वी होतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून ‘बीआरएस’ने हालचाली वाढविल्या असून, २८८ जागा लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे वरिष्ठ सूत्राने सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘बीआरएस’ची वाट धरली आहे. आता अन्नदाता शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा जयाजी सूर्यवंशी यांनी हैदराबादमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे उपस्थित होते. आम्ही आमची संपूर्ण संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन केली असल्याचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. तेलंगणात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज व पाणी मोफत मिळते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही शून्य टक्के आहे. २४ एप्रिल रोजीच्या जाहीर सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. आमखास मैदानावर होणारी ही सभा आता जबिंदा लॉन्सवर होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून स्थळ बदलण्यात आले आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी