शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डीलिट प्रदान, सन्मानाने कुटुंबिय भावनिक

By योगेश पायघन | Updated: November 27, 2022 20:24 IST

एमजीएम दीक्षांत सोहळा, ५३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; ९ विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडलने सत्कार

औरंगाबाद: एमजीएम विद्यापीठाकडून पहिल्या दीक्षांत सोहळ्यात पहिली मानद वाड:मय पंडीत पदवी (डी.लिट) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आली. कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते या सन्मानाच्या डी.लीट पदवीचा स्विकार करतांना त्यांच्या स्नुषा सावित्री मधुकर साठे यांना आनंदाश्रु अनावर झाले होते. यावेळी एमजीएम विद्यापीठातून उत्तीर्ण ५३४ विद्यार्थ्यांनाही या वेळी पदवी प्रदान करण्यात आली.

खच्चुन भरलेले रूख्मिनी सभागृहात उपस्थितांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात या अण्णाभाऊंच्या केलेल्या सन्मानाबद्दल आदर व्यक्त केला. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या शिस्तबद्ध व दिमाखदार सोहळ्यास एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, डॉ. नितीन कदम, डॉ. सुधीर कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, रणजीत कक्कड, भाऊसाहेब राजळे, डॉ. शशांक दळवी, डॉ. एच.एच.शिंदे, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ. विजया देशमुख, डॉ. रेखा शेळके, पार्वती दत्ता, डॉ. विजया मुसांडे, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सावित्री मधुकर साठे म्हणाल्या. ‘आज मला खूप आनंद झालाय, जी पदवी अण्णाभाऊंच्या हातात द्यायला पाहिजी. ती पदवी अण्णाभाऊंच्या सुनबाईच्या हातात देताय. आजचा दिवस आणि मी त्यांची सुन म्हणून खुप भाग्याची हाय. एमजीएम विद्यापीठाने केलेल्या गौरवाबद्दल मनापासुन आभार’. एमजीएम विद्यापीठाने ही भूमिका घेणे समता आणि बंधुत्वाची आहे. अण्णाभाऊ साठेंच्या गुणवत्तेला आतापर्यंत मिळालेला नकाराला ही चपराक आहे.आजपर्यंत जात पाहून अण्णाभाऊंच्या सन्मानाला नाकारण्यांना एमजीएम विद्यापीठाची समता आणि बंधुत्वाची ही चपराक असल्याचे त्यांचे नातू सचिन साठे म्हणाले.

या सन्मानामुळे येणाऱ्या काळात त्यांना भारतरत्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून साठे कुटुंबिय आणि समाजबांधवांकडून आभार मानले. अध्यक्षीय समारोप कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. वैष्णवी जोशी, नितीन गोरे, पी.अॅन्सी ग्रॅन्ना पी, अमिता चौहाण, कोमल ओझा, शिवानी शेटे, शुभांगी पाटील, मोहम्मद कैफ रफिक अहमद देशमुख, सौमय्या मकराणी या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा चान्सलर्स गोल्ड मेडल देवून सत्कार करण्यात आला. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन कुलसचिव डाॅ. आशिष गाडेकर यांनी केले.

उच्च शिक्षणात मानवी मुल्यांचीही जपणूक व्हावी : काकोडकरप्रत्येक अध्ययनार्थींना तंत्रज्ञानात्मक शिक्षणापर्यंत पोहोचवणे, व्यवसायिकांची निर्मिती करून आसपासाची इकॉलॉजी आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी योगदान देणे, तळागाळातील लोकांच्या क्षमतांचे सक्षमीकरण करतांना मानवी मुल्यांचीही जपणूक झाली पाहिजे. संशोधन प्रकाशनात देश तिसऱ्या असून त्यात गुणवत्ता आणि संख्यात्मक वाढीचा प्रयत्न व्हावा. स्टॅनफोर्ड विद्यापीठाप्रमाणे आर्थीक हातभार लावणारी इकोसिस्टम विद्यापीठातून तयार व्हावी, ग्रामीण-शहरी दरी कमी व्हायला हवी. असे शास्ज्ञज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी दीक्षांत भाषणात म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद