शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अन्...छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास ऑस्करपर्यंत पोहचला: सीमा बिस्वास

By बापू सोळुंके | Updated: January 17, 2025 20:07 IST

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी  उलगडला आपला जीवनप्रवास

छत्रपती संभाजीनगर : आपल्याला एक नृत्यांगणा व्हायचे होते, मात्र, पहिल्यांदा अभिनय केला आणि लक्षात आले की, आपल्याला यापुढे अभिनयच करायचा आहे.  अन एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रेरक प्रवास ऑस्करपर्यंत पोहचला, अशा शब्दात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला. 

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय सिनेमा स्पर्धेच्या ज्यूरी पर्सन सीमा बिस्वास यांची प्रकट मुलाखत  शुक्रवारी प्रा. शिव कदम यांनी  प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स सिनेमागृहात घेतली. यावेळी प्रा. कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सडेतोड आणि  शांतपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, ‘बॅडिंट क्वीन’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ३ दिवस झोपले नव्हते. तेव्हा आपणच ही भूमिका केवळ करू शकते असे आपल्या लक्षात आले. बॅडिंट क्वीन चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील, असा होता. ‘बॅडिंट क्वीन’नंतर मला स्वत:ला मी एक वादग्रस्त अभिनेत्री नसून अभिनेत्री आहे, हे सिद्ध करायचे होते म्हणून मी 'खामोशी' हा चित्रपट केला असल्याचे अभिनेत्री सीमा यांनी सांगितले.

अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांना मी कायम सांगत असते की, आपण कोणतीही भूमिका प्रामाणिकपणे केली पाहिजे. चित्रपटातील भूमिकांमधून प्रेरणा घ्यावी, त्यांना आपण कॉपी करू नये, कॉपी केल्यामुळे मूळ भूमिकेतील आत्मा नष्ट होतो. आपण भूमिका करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना ती भूमिका जगली पाहिजे. तरच त्या भूमिकेला न्याय देता येतो. आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम जोरकसपणे करत राहिले पाहिजे. आपले उत्तम आणि दर्जेदार काम हेच टिकेला उत्तर असते, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड