शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अन्...छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास ऑस्करपर्यंत पोहचला: सीमा बिस्वास

By बापू सोळुंके | Updated: January 17, 2025 20:07 IST

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी  उलगडला आपला जीवनप्रवास

छत्रपती संभाजीनगर : आपल्याला एक नृत्यांगणा व्हायचे होते, मात्र, पहिल्यांदा अभिनय केला आणि लक्षात आले की, आपल्याला यापुढे अभिनयच करायचा आहे.  अन एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रेरक प्रवास ऑस्करपर्यंत पोहचला, अशा शब्दात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला. 

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय सिनेमा स्पर्धेच्या ज्यूरी पर्सन सीमा बिस्वास यांची प्रकट मुलाखत  शुक्रवारी प्रा. शिव कदम यांनी  प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स सिनेमागृहात घेतली. यावेळी प्रा. कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सडेतोड आणि  शांतपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, ‘बॅडिंट क्वीन’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ३ दिवस झोपले नव्हते. तेव्हा आपणच ही भूमिका केवळ करू शकते असे आपल्या लक्षात आले. बॅडिंट क्वीन चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील, असा होता. ‘बॅडिंट क्वीन’नंतर मला स्वत:ला मी एक वादग्रस्त अभिनेत्री नसून अभिनेत्री आहे, हे सिद्ध करायचे होते म्हणून मी 'खामोशी' हा चित्रपट केला असल्याचे अभिनेत्री सीमा यांनी सांगितले.

अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांना मी कायम सांगत असते की, आपण कोणतीही भूमिका प्रामाणिकपणे केली पाहिजे. चित्रपटातील भूमिकांमधून प्रेरणा घ्यावी, त्यांना आपण कॉपी करू नये, कॉपी केल्यामुळे मूळ भूमिकेतील आत्मा नष्ट होतो. आपण भूमिका करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना ती भूमिका जगली पाहिजे. तरच त्या भूमिकेला न्याय देता येतो. आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम जोरकसपणे करत राहिले पाहिजे. आपले उत्तम आणि दर्जेदार काम हेच टिकेला उत्तर असते, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड