शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 11:11 IST

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. तसेच दावने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत हा प्रश्न कधी मार्गी लावणार असा जाबही विचारला. जिल्ह्यातील ब्रम्हगव्हाण उपसासिंचन आढावा बैठक पैठण येथील खेर्डामध्ये पार पडली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. 

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण सुरू करताच, काही वेळातच शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषणात गोंधळ सुरू केला. दानवे यांना जाब विचारत ब्रम्हगव्हाण ऊपसिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली. तसेच खतांच्या वाढलेल्या दरांबाबत शेतकऱ्यांनी दानवेंना प्रश्न विचारले. या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून दानवेंनी 5 मिनिटांसाठी आपले भाषण थांबवत शेतकऱ्यांची समजूत काढली. ब्रम्हगव्हाण उपसासिंचन योजनेचा पहिला टप्पा लवकरच मार्गी लागावा आणि दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू व्हावे यासाठी लागेल होत पैसा सरकार देईल. मात्र, लवकरात लवकर 41 कोटी रुपये देणार असल्याचे दानवेंनी सांगितले. त्यानंतर, भाषण आवरते घेत कार्यक्रमाचा लवकरच समारोप करण्यात आला. 

दरम्यान, आमच्या सरकारच्या काळात दुष्काळ नाही, विरोधकांकडून विनाकारण दुष्काळ असल्याचा दावा केला जात आहे. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, असेही दानवेंनी म्हटले. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून दावने यांच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच दानवे यांना नेहमीच शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.   

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी