शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

... अन् रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 11:11 IST

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. तसेच दावने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत हा प्रश्न कधी मार्गी लावणार असा जाबही विचारला. जिल्ह्यातील ब्रम्हगव्हाण उपसासिंचन आढावा बैठक पैठण येथील खेर्डामध्ये पार पडली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. 

ब्रम्हगव्हाण उपसासिंचन टप्पा दोनच्या कामासाठी आयोजित बैठकीत खा. रावसाहेब दानवे यांनाही निमंत्रण करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपले भाषण सुरू करताच, काही वेळातच शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषणात गोंधळ सुरू केला. दानवे यांना जाब विचारत ब्रम्हगव्हाण ऊपसिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली. तसेच खतांच्या वाढलेल्या दरांबाबत शेतकऱ्यांनी दानवेंना प्रश्न विचारले. या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून दानवेंनी 5 मिनिटांसाठी आपले भाषण थांबवत शेतकऱ्यांची समजूत काढली. ब्रम्हगव्हाण उपसासिंचन योजनेचा पहिला टप्पा लवकरच मार्गी लागावा आणि दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू व्हावे यासाठी लागेल होत पैसा सरकार देईल. मात्र, लवकरात लवकर 41 कोटी रुपये देणार असल्याचे दानवेंनी सांगितले. त्यानंतर, भाषण आवरते घेत कार्यक्रमाचा लवकरच समारोप करण्यात आला. 

दरम्यान, आमच्या सरकारच्या काळात दुष्काळ नाही, विरोधकांकडून विनाकारण दुष्काळ असल्याचा दावा केला जात आहे. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, असेही दानवेंनी म्हटले. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून दावने यांच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच दानवे यांना नेहमीच शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.   

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी