शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर; रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:18 IST

रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु.

ठळक मुद्देराजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण युध्दात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची

औरंगाबाद: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालिल वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी अपयशी ठरली असून आता आम्ही आमचा मार्ग चोखाळणार असल्याचे आनंदराज यांनी आज येथे जाहीर केले. रिपब्लिकन सेना नव्याने उभारणार असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात रिपब्लिकन सेनेची दुपारी  महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु. राजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण असले तरी युध्दात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची असे ठरवले आहे असे सांगून आनंदराज म्हणाले, सीएए आणि एनआरसीचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपकडे आता राम मंदिराचाही मुद्दा राहिला नाही.त्याचाही त्यांना फटका बसेल.

केंद्र सरकावर टिका करताना आनंदराज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार आज जे काही देशात आणू पाहत आहे,ते दुर्दैवी होय. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले,तेव्हा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत होता. मात्र हे स्वप्न आता पार धुळीस मिळाले आहे. जीडीपी रसातळला गेला आहे. सीएए आणि एनआरसीने देशाचा कोणताही विकास होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी नोंदवले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबाद