शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर; रिपब्लिकन सेनेची नव्याने उभारणी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:18 IST

रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु.

ठळक मुद्देराजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण युध्दात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची

औरंगाबाद: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालिल वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी अपयशी ठरली असून आता आम्ही आमचा मार्ग चोखाळणार असल्याचे आनंदराज यांनी आज येथे जाहीर केले. रिपब्लिकन सेना नव्याने उभारणार असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात रिपब्लिकन सेनेची दुपारी  महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करु. राजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण असले तरी युध्दात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची असे ठरवले आहे असे सांगून आनंदराज म्हणाले, सीएए आणि एनआरसीचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपकडे आता राम मंदिराचाही मुद्दा राहिला नाही.त्याचाही त्यांना फटका बसेल.

केंद्र सरकावर टिका करताना आनंदराज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार आज जे काही देशात आणू पाहत आहे,ते दुर्दैवी होय. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले,तेव्हा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत होता. मात्र हे स्वप्न आता पार धुळीस मिळाले आहे. जीडीपी रसातळला गेला आहे. सीएए आणि एनआरसीने देशाचा कोणताही विकास होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी नोंदवले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबाद