शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

ऐन दुष्काळात विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचे चटके; ५० टक्क्यांनी वाढवले वसतिगृहाचे शुल्क

By राम शिनगारे | Updated: April 11, 2024 11:53 IST

शुल्क वाढीस व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची विद्यापीठ प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नसतानाच विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क तब्बल ५० टक्क्यांहून अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये वसतिगृह विकास समितीने शिफारस केलेल्या शिफारशीनुसार वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याचा ठराव २६व्या क्रमांकावर होता. हा विषय बैठकीला चर्चेला आल्यानंतर सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यावर कोणत्याही सदस्याने मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शुल्कवाढ पुढे ढकलण्याची मागणी केली नसल्याचेही समोर आले. एकमतानेच हा निर्णय मंजूर केला. या शुल्कवाढीचे चटके आता ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना बसणार आहेत. त्यामुळे या निर्णयास विद्यार्थ्यांमधून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

शुल्कवाढ अशीव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार वसतिगृहाचे वार्षिक शुल्क २ हजार ६५ रुपये होते. त्यात ५० टक्क्यांची वाढ करून ३ हजार २०० रुपये होणार आहे. वसतिगृह प्रवेशाची अनामत रक्कम २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली. विदेशी विद्यार्थिनी वसतिगृहाचे शुल्क २५ हजार रुपयांवरून ३५ हजार रुपये करण्यात आले. तसेच विदेशी विद्यार्थ्याच्या जोडीदारासाठी वार्षिक १२ हजार ५०० रुपयांऐवजी २० हजार रुपये शुल्क करण्यात आले. तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट चार्ज प्रतिदिन २५ रुपये होता. तो आता ५० रुपये करण्यात आला आहे.

या समितीने केली होती शिफारसविद्यापीठातील वसतिगृहांच्या संदर्भात वसतिगृह विकास समितीची प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची ६ एप्रिल रोजी बैठक झाली. या बैठकीला कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, पदवीधर विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन परिषदेतील सदस्य डॉ. योगिता होके-पाटील, ॲड. दत्ता भांगे, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. याच बैठकीत ऐन दुष्काळात वसतिगृहांचे शुल्क वाढविण्याची शिफारस करण्यात आली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण