शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘आमदनी चवन्नी खर्चा रुपय्या, ना पुछो हाल...’मनपा आयुक्तांची कबुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:17 IST

एकीकडे गरज नसताना गुळीगुळीत रस्ते तयार होत आहेत. दुसरीकडे रस्त्यात पाय ठेवायलाही जागा नाही.

औरंगाबाद : महापालिकेची अवस्था ‘आमदनी चवन्नी खर्चा रुपय्या,’ अशी झाली आहे. एकीकडे गरज नसताना गुळीगुळीत रस्ते तयार होत आहेत. दुसरीकडे रस्त्यात पाय ठेवायलाही जागा नाही. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा कुठेतरी थांबल्या पाहिजेत, कंत्राटदार महापालिकेच्या विकासात कणा आहेत. खिशातील पैसे लावून ते कामे करतात. त्यांना वाऱ्यावर अजिबात सोडता येणार नाही. छोट्या कंत्राटदारांची बिले अदा करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी लेखा विभागाला दिले.

सर्व कंत्राटदारांनी मंगळवारी सायंकाळी आयुक्तांची पालिकेत भेट घेतली. मागील सहा महिन्यांपासून बिले न मिळाल्याने कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विद्युत, पाणीपुरवठ्याच्या कंत्राटदारांनी ऐन गणेशोत्सवात असहकार पुकारले आहे. परिस्थिती चिघळत असल्याने आयुक्तांनी सर्व कंत्राटदारांसोबत सायंकाळी बैठक घेण्याचे निश्चित केले होते. बैठकीस सर्व छोटे कंत्राटदार, संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे आदींची उपस्थिती होती. 

महापौरांनी घेतला आढावामहापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळीच आयुक्त डॉ. निपुण विनायक, मुख्य लेखाधिकारी पी. आर. केंद्रे, लेखाधिकारी संजय पवार यांच्यासोबत महापौर दालनात बैठक घेतली. जीएसटीतील २१ कोटींच्या अनुदानातून ७ कोटी रुपये विकासकामांसाठी देण्यात यावे, अशी सूचना महापौरांनी केली. आयुक्तांनी महापौरांची सूचना मान्य करीत तातडीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश लेखा विभागाला दिले. आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, उत्पन्न वाढीसाठी नियोजन केले जात आहे. अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. वसुली झाली नाही तर अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात येईल.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी