शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आला आमरसाचा हंगाम; औरंगाबाद बाजरपेठेत लालबाग, हापूस दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:43 IST

फळांच्या राजाचे बाजारात आगमन

ठळक मुद्देसध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोंची विक्री

औरंगाबाद :  खवय्यांना मोहित करणारा फळांचा राजा आंबाबाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, खिशाला न परवडणाऱ्या किमतीमुळे अजून सर्वसामान्य ग्राहक आंबा हातात घेण्यास तयार नाहीत. 

उन्हाचा पारा चढत असताना बाजारात हंगामी फळ आंबा विक्रीला आला आहे. बंगलोरहून लालबाग आला आहे. १५० ते १८० रुपये किलोने हा आंबा विकल्या जात आहे. शहरातील  मोजक्याच  विक्रेत्यांकडे हा आंबा उपलब्ध आहे. हापूस आंबाही आला असून, रत्नागिरीचा हापूस म्हणून तो विकण्यात येत आहे. चक्क १००० ते १२०० रुपये डझन या भावात हापूस विकल्या जात आहे. नवाबपुरा परिसरातील फळांचे विक्रेते शेख खलील यांनी सांगितले की, सध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोच आंबे विकल्या जात आहेत. 

मुंबई, पुणे येथे नंबर १ दर्जाचे आंबे विकल्या जातात. औरंगाबादेत चौथ्या, पाचव्या दर्जाचे आंबे विक्रीला येतात. मराठवाड्यातील नंबर १ दर्जाचा केशरही शहरात विक्रीला येत नाही. मुंबई, पुणे आदी महानगरात या आंब्यांना जास्त भाव मिळतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले. रत्नागिरीचा नंबर एक हापूस फेब्रुवारीपासूनच मुंबई, पुणे बाजारात विक्रीला येत आहे. आपल्याकडे येत असलेला हापूस हा चौथ्या व पाचव्या दर्जाचा असून, मागील १० दिवसांपासून उपलब्ध होऊ लागला आहे. आता येत्या १५ ते २० दिवसांनी आंध्र प्रदेशातील बदाम व एप्रिल महिन्यात गुजरातमधील केशर आंबा विक्रीला येईल. 

अक्षय तृतीयेपासून वाढते आंब्याला मागणी मे महिन्यापासून बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होईल. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, आजही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय तृतीयापासूनच आंबे खाण्यास सुरुवात करतात. यंदा अक्षय तृतीया ७ मे रोजी  येत आहे. त्यानंतरच आंब्याची विक्री वाढेल. 

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाMarketबाजार