शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

आला आमरसाचा हंगाम; औरंगाबाद बाजरपेठेत लालबाग, हापूस दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:43 IST

फळांच्या राजाचे बाजारात आगमन

ठळक मुद्देसध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोंची विक्री

औरंगाबाद :  खवय्यांना मोहित करणारा फळांचा राजा आंबाबाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, खिशाला न परवडणाऱ्या किमतीमुळे अजून सर्वसामान्य ग्राहक आंबा हातात घेण्यास तयार नाहीत. 

उन्हाचा पारा चढत असताना बाजारात हंगामी फळ आंबा विक्रीला आला आहे. बंगलोरहून लालबाग आला आहे. १५० ते १८० रुपये किलोने हा आंबा विकल्या जात आहे. शहरातील  मोजक्याच  विक्रेत्यांकडे हा आंबा उपलब्ध आहे. हापूस आंबाही आला असून, रत्नागिरीचा हापूस म्हणून तो विकण्यात येत आहे. चक्क १००० ते १२०० रुपये डझन या भावात हापूस विकल्या जात आहे. नवाबपुरा परिसरातील फळांचे विक्रेते शेख खलील यांनी सांगितले की, सध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोच आंबे विकल्या जात आहेत. 

मुंबई, पुणे येथे नंबर १ दर्जाचे आंबे विकल्या जातात. औरंगाबादेत चौथ्या, पाचव्या दर्जाचे आंबे विक्रीला येतात. मराठवाड्यातील नंबर १ दर्जाचा केशरही शहरात विक्रीला येत नाही. मुंबई, पुणे आदी महानगरात या आंब्यांना जास्त भाव मिळतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले. रत्नागिरीचा नंबर एक हापूस फेब्रुवारीपासूनच मुंबई, पुणे बाजारात विक्रीला येत आहे. आपल्याकडे येत असलेला हापूस हा चौथ्या व पाचव्या दर्जाचा असून, मागील १० दिवसांपासून उपलब्ध होऊ लागला आहे. आता येत्या १५ ते २० दिवसांनी आंध्र प्रदेशातील बदाम व एप्रिल महिन्यात गुजरातमधील केशर आंबा विक्रीला येईल. 

अक्षय तृतीयेपासून वाढते आंब्याला मागणी मे महिन्यापासून बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होईल. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, आजही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय तृतीयापासूनच आंबे खाण्यास सुरुवात करतात. यंदा अक्षय तृतीया ७ मे रोजी  येत आहे. त्यानंतरच आंब्याची विक्री वाढेल. 

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाMarketबाजार