शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जरी पूर्ण भरला नाथसागर; तरी नळाखाली रिकामी घागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:20 IST

Jayakwadi Dam शहरात पाणीच पाणी, जायकवाडीही भरले, पण शहराला ६ व्या दिवशी पाणी

ठळक मुद्दे नागरिकांकडून नाराजीसामाजिक माध्यमांवर रंगली चर्चा

औरंगाबाद : शहरात मुसळधार पावसाने ( Heavy Rain in Aurangabad ) अनेक भागांत पाणीच पाणी साचले. दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षी जायकवाडी धरण ( Jayakwadi Dam) भरले. तरीही शहराला ६ व्या दिवशी पाणी मिळते, याविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जायकवाडी धरणातून बुधवारी विसर्ग करण्यात आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवरही चांगलीच चर्चा रंगली.

जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्ग होणारे छायाचित्र शेअर करीत सामाजिक माध्यमांवर पाणीपुरवठ्याविषयी कोणी संताप व्यक्त करीत होते, तर कोणी ‘तू (जायकवाडी धरण) किती पण भरला तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार’ अशा विनोदी शैलीत मनपाच्या कारभारावर टीका करीत होते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी काही महिला आणि तरुणांनी संवाद साधण्यात आला.

आजाराला आमंत्रणजायकवाडी भरून गेले. परंतु नळाला सहा दिवस पाणी येणार नाही, या चिंतेने घरामध्ये जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. त्यातून मग विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. किमान एक ते दोन दिवसाआड पाणी मिळेल, असे मनपाने नियोजन करावे.- ज्ञानेश्वर बनसोडे

नळही आले नाहीतजायकवाडी धरणे भरले. परंतु आमच्या तारांगणनगर, मुकुंदवाडी या भागात तर अजून नळही आलेले नाहीत. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. त्यातही पाऊस पडला तर टँकर येतच नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही जार घ्यावे लागतात.- उषा खिल्लारे

मनपाने योग्य नियोजन करावेशहरात पावसामुळे अनेक भागांत पाणीच पाणी साचले. धरणात पाणी नाही, असाही विषय नाही. तरीही आम्हा महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाणी जपून वापरावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.- छाया पिंपळे

शहराचे दुर्दैवचजायकवाडी धरणे भरले तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार, असा संदेश बुधवारी सामाजिक माध्यमांवरून फिरत हाेता. ही सत्य परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत जायकवाडी धरण वारंवार भरत आहे. परंतु औरंगाबाद रोज अथवा एक दिवसाआड पाणी मिळत नाही, हे शहराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.-मयुर भानुदास पा. बेडके

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका