शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

जरी पूर्ण भरला नाथसागर; तरी नळाखाली रिकामी घागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:20 IST

Jayakwadi Dam शहरात पाणीच पाणी, जायकवाडीही भरले, पण शहराला ६ व्या दिवशी पाणी

ठळक मुद्दे नागरिकांकडून नाराजीसामाजिक माध्यमांवर रंगली चर्चा

औरंगाबाद : शहरात मुसळधार पावसाने ( Heavy Rain in Aurangabad ) अनेक भागांत पाणीच पाणी साचले. दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षी जायकवाडी धरण ( Jayakwadi Dam) भरले. तरीही शहराला ६ व्या दिवशी पाणी मिळते, याविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जायकवाडी धरणातून बुधवारी विसर्ग करण्यात आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवरही चांगलीच चर्चा रंगली.

जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्ग होणारे छायाचित्र शेअर करीत सामाजिक माध्यमांवर पाणीपुरवठ्याविषयी कोणी संताप व्यक्त करीत होते, तर कोणी ‘तू (जायकवाडी धरण) किती पण भरला तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार’ अशा विनोदी शैलीत मनपाच्या कारभारावर टीका करीत होते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी काही महिला आणि तरुणांनी संवाद साधण्यात आला.

आजाराला आमंत्रणजायकवाडी भरून गेले. परंतु नळाला सहा दिवस पाणी येणार नाही, या चिंतेने घरामध्ये जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. त्यातून मग विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. किमान एक ते दोन दिवसाआड पाणी मिळेल, असे मनपाने नियोजन करावे.- ज्ञानेश्वर बनसोडे

नळही आले नाहीतजायकवाडी धरणे भरले. परंतु आमच्या तारांगणनगर, मुकुंदवाडी या भागात तर अजून नळही आलेले नाहीत. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. त्यातही पाऊस पडला तर टँकर येतच नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही जार घ्यावे लागतात.- उषा खिल्लारे

मनपाने योग्य नियोजन करावेशहरात पावसामुळे अनेक भागांत पाणीच पाणी साचले. धरणात पाणी नाही, असाही विषय नाही. तरीही आम्हा महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाणी जपून वापरावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.- छाया पिंपळे

शहराचे दुर्दैवचजायकवाडी धरणे भरले तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार, असा संदेश बुधवारी सामाजिक माध्यमांवरून फिरत हाेता. ही सत्य परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत जायकवाडी धरण वारंवार भरत आहे. परंतु औरंगाबाद रोज अथवा एक दिवसाआड पाणी मिळत नाही, हे शहराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.-मयुर भानुदास पा. बेडके

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका