शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जरी पूर्ण भरला नाथसागर; तरी नळाखाली रिकामी घागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:20 IST

Jayakwadi Dam शहरात पाणीच पाणी, जायकवाडीही भरले, पण शहराला ६ व्या दिवशी पाणी

ठळक मुद्दे नागरिकांकडून नाराजीसामाजिक माध्यमांवर रंगली चर्चा

औरंगाबाद : शहरात मुसळधार पावसाने ( Heavy Rain in Aurangabad ) अनेक भागांत पाणीच पाणी साचले. दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षी जायकवाडी धरण ( Jayakwadi Dam) भरले. तरीही शहराला ६ व्या दिवशी पाणी मिळते, याविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जायकवाडी धरणातून बुधवारी विसर्ग करण्यात आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवरही चांगलीच चर्चा रंगली.

जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्ग होणारे छायाचित्र शेअर करीत सामाजिक माध्यमांवर पाणीपुरवठ्याविषयी कोणी संताप व्यक्त करीत होते, तर कोणी ‘तू (जायकवाडी धरण) किती पण भरला तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार’ अशा विनोदी शैलीत मनपाच्या कारभारावर टीका करीत होते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी काही महिला आणि तरुणांनी संवाद साधण्यात आला.

आजाराला आमंत्रणजायकवाडी भरून गेले. परंतु नळाला सहा दिवस पाणी येणार नाही, या चिंतेने घरामध्ये जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. त्यातून मग विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. किमान एक ते दोन दिवसाआड पाणी मिळेल, असे मनपाने नियोजन करावे.- ज्ञानेश्वर बनसोडे

नळही आले नाहीतजायकवाडी धरणे भरले. परंतु आमच्या तारांगणनगर, मुकुंदवाडी या भागात तर अजून नळही आलेले नाहीत. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. त्यातही पाऊस पडला तर टँकर येतच नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही जार घ्यावे लागतात.- उषा खिल्लारे

मनपाने योग्य नियोजन करावेशहरात पावसामुळे अनेक भागांत पाणीच पाणी साचले. धरणात पाणी नाही, असाही विषय नाही. तरीही आम्हा महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाणी जपून वापरावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.- छाया पिंपळे

शहराचे दुर्दैवचजायकवाडी धरणे भरले तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार, असा संदेश बुधवारी सामाजिक माध्यमांवरून फिरत हाेता. ही सत्य परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत जायकवाडी धरण वारंवार भरत आहे. परंतु औरंगाबाद रोज अथवा एक दिवसाआड पाणी मिळत नाही, हे शहराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.-मयुर भानुदास पा. बेडके

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका